tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post9009938339566332341..comments2023-10-06T04:50:53.708-07:00Comments on बृहत्कथा: महाराष्ट्र देशी असावे!Dnyanada Deshpandehttp://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-71328376390857296622010-09-23T23:43:17.805-07:002010-09-23T23:43:17.805-07:00@ Mandar Gadre- Sorry for this belated reply. But ...@ Mandar Gadre- Sorry for this belated reply. But yes. I accept. Its a glitch. ' kharya arthana nagrik/ manus asana could have worked better. Thanks a lot for pointing out at the crack in my lens. Appreciate.- DnyanadaDnyanada Deshpandehttps://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-41201563380921345292010-07-13T00:22:04.119-07:002010-07-13T00:22:04.119-07:00खूप आवडला तुमचा लेख. आधीचेही वाचून पाहिले, आणि खूप...खूप आवडला तुमचा लेख. आधीचेही वाचून पाहिले, आणि खूप नव्या गोष्टी कळल्या. आभार! :)<br /><br />शेवटचं वाक्य खटकलं. "ख-या अर्थानं मराठी असणं म्हणजे...". ह्या वाक्यात "मराठी"च्या ऐवजी कोणीही आपापल्या जाति-ज्ञाति-देशाचं नाव घालून तेच वाक्य लिहू शकतं. कारण त्या वाक्यातल्या सद्गुणांचा मराठी असण्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाहीये. आणि मग "भाषेचं राजकारण करणारी माणसं "खरी मराठी" नाहीत" असल्या युक्तिवादातली पळवाट लक्षात येते. "न्यूयॉर्कवर हल्ला करणारे खरे मुसलमान नव्हेतच" - हे विधानही फार वेगळं नाहीये.<br />"खरी मराठी"ला मी युक्तिवाद म्हणतोय कारण अनेक लोक 'सेने'वर टीका करताना "हे असले लोक खरे मराठी नव्हेतच" असं म्हणतात. जसं "धर्मप्रेमाची परिणती हिंसेत होते" ह्याला "हिंसा करणारे खरे मुसलमान/ख्रिश्चन/हिंदू नव्हेतच" असं उत्तर दिलं जातं. <br /><br />(विषयांतर): दुस-या बाजूला, टिळक-सावरकर मराठी होते/ ब्राह्मण होते म्हणून आजच्या मराठी माणसांनी/ ब्राह्मणांनी छात्या फुगवणं तितकंच फोल वाटतं. त्यांनी जे केलं ते आतून वाटलं-पटलं म्हणून. ते अमुक भाषिक, तमुक जातीय होते म्हणून नाही. "ख-या" मराठीपणाच्या/ कसल्याही "पणा"च्या असल्या परिभाषांतून केवळ गोंधळ आणि पर्यायाने घमेंड निर्माण होतात.<br /><br />कुठलाही "पणा" हा प्रवाही नसला तर ('तरच' नाही) कदाचित त्याची "खरी" व्याख्या करायला घेता येईल, आणि तरीही ती किती अर्थपूर्ण असेल, कोण जाणे?Mandar Gadrehttps://www.blogger.com/profile/03661021322524933940noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-87653947694533821832010-07-12T20:14:34.780-07:002010-07-12T20:14:34.780-07:00उत्तम लेख, विशेषत: लेखाचा दुसरा भाग खूप आवडला. ’भय...उत्तम लेख, विशेषत: लेखाचा दुसरा भाग खूप आवडला. ’भयापोटी माणूस संकुचित विचार करतो’ हा सिद्धांत ऍन्थ्रॉपॉलॉजीच्या विस्तृत पटावर तपासून पाहण्याच्या कल्पनेनं जिज्ञासा चाळवलीये. हा सिद्धांत ’तपासणं’ म्हणजे नक्की काय? इतिहास अथवा वर्तमानातली उदाहरणं बघितली तर या वाक्याचा व्यत्यास तपासणं जास्त सोपं आहे असं वाटतं. (’माणूस संकुचित विचार करतो तेव्हा तो भ्यालेला असतो’.) कारण संकुचित विचार अथवा कृतीचे पुरावे जेव्हा दिसतात, तेव्हा त्यांच्यामागच्या भीतीचा माग काढणं जास्त सोपं असतं. दुसरा इंतरेस्टिंग प्रश्न म्हणजे न्यूरोसायकॉलॉजीमधली 'amygdala hijack' सारखी संकल्पना सामूहिक पातळीवर काय स्वरूप धारण करते? <br /><br />राजकीय पक्षांना भाषेला राबवायचं आहे, वाढवायचं नाही हे निरीक्षण (भाषा या ठिकाणी इतर कोणतीही साधनसंपत्ती उदा. मनुष्यबळ, निसर्ग, विचार हा शब्द घातला तरी चालेल) पटलं. पण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरची विविधता असलेल्या समाजात हे असं ’सोयीचं राजकारण’ करणं हेच कुठल्याही पक्षाला किमान टिकून राहण्यासाठी गरजेचं वाटत असणार. त्यामुळे या भाषेच्या राजकारणाच्या नावानं खडे फोडणं , हे राजकारण कसं घातक आहे हे लोकांना सांगणं आवश्यक आहे हे खरंच- पण असं सांगणार्यांनी हे लक्षात घेणंही गरजेचं आहे की ज्या ’भीती’ला हे लोक कॅश करतात, त्या भीतीनं ग्रासलेले लोक अशा सावधगिरीच्या इशार्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करतात, नव्हे तसे इशारे देणार्यांनाच मूर्ख / घातक मानतात. त्यामुळेच कदाचित ज्यांना भाषा खरंच वाढवायची आहे अशा लोकांना इथे एक प्रति-राजकारण करायला वाव आहे: असल्या घोषणा करणार्यांकडून भाषाकोश / भाषांतरनिधी वगैरे उभे करून घ्यायचे या सगळ्या गदारोळात. <br />कारण ’रोबस्ट’ आणि तत्त्वनिष्ठ राजकारणासाठी एक खराखुरा रोबस्ट शत्रू लागतो, आणि तोच आपल्याकडे अस्तित्त्वात नाही - मग लोकांनी एकत्र तरी कशाविरुद्ध व्हायचं? (लोकांनी आपणहून, फक्त सकारात्मक गोष्टीसाठी , समोर कोणताही खरा किंवा काल्पनिक शत्रू नसताना कशाच्यातरी समर्थनार्थ एकत्र येण्याची उदाहरणं ही लोकांनी आपणहून कशाच्यातरीविरुद्ध उठाव केल्यापेक्षा कमी आहेत असं मला वाटतं .. या वर्तनाचं मूळही भीतीतच असेल का?)Gayatrihttps://www.blogger.com/profile/18298630136699109479noreply@blogger.com