सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन, त्यांची सामाजिक सलोखा/शांतता टिकवण्याची जबाबदारी, आपल्याला सहन न होणारे विचार कोणी पुस्तकरूपाने मांडले तर त्याचे काय करायचे? किंवा ज्या पुस्तकातले विचार , त्यांची मांडणी अयोग्य वाटते त्यांचे काय करायचे असे विविध प्रश्न -विविध बाजू नजरेसमोर आल्या.
जेम्स लेन हे रिलिजस स्टडीज या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 1985 पासून मॅकलिस्टर कॉलेजमध्ये अध्यापन केले आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून टीएच.डी. म्हणजे डॉक्टरेट इन थिऑलॉजी ही पदवी घेतली. त्यांचा भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील हिंदू आणि मुस्लिम परंपरांचा, संस्कृतीचा, इतिहासाचा अभ्यास आहे. लेन यांच्याकडे महाराष्ट्र स्टडीज ग्रुप (एमएसजी) या, महाराष्ट्राचा अभ्यास करणा-या अॅकॅडमिक गटाचं नेतृत्व करणारे प्राध्यापक आहे. 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. त्याविरुध्द संघराज रूपवते, आनंद पटवर्धन आणि कुंदा प्रमिला नीळकंठ यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं ही बंदी उठवली आणि वादळास सुरुवात झाली.
सुरुवातीलाच, मी माझी भूमिका स्पष्ट करते. मला प्राध्यापक लेन यांनी केलेली शिवचरित्राची मांडणी, शिवाजी महाराजांच्या 'मिथ'चे त्यांनी केलेले भंजन आणि त्या संदर्भात केलेले लेखन बेजाबदार वाटते आणि पटत नाही. परंतु पुस्तकावर बंदी घालणं हा त्यावर उपाय नाही. आक्षेपार्ह मजकुरावर कारवाई होऊ शकते, तो गाळला जाऊ शकतो, त्यावर वाद घातला जाऊ शकतो, प्रतिवादात पुस्तक लिहिता येतं. परंतु 'बंदी घालणं' हा राज्य सरकारनं निवडलेला पर्याय केवळ तात्पुरता, विचार न करता, व्होट बँका नजरेसमोर ठेवून केलेला उद्योग असल्यामुळे तो न्यायालयात टिकू शकलेला नाही. विचारांचा / कमी दर्जाच्या लेखनाचा प्रतिवाद विचारांनी होऊ शकतो. त्यासाठी रिचर्स इन्स्टिट्यूटवर हल्ले करणे किंवा हिंस्त्र मार्गांचा, लोकशाहीविरोधी मार्गांचा अवलंब करणे हे चुकीचे आहे. त्याचबरोबर पुस्तकावर बंदी घालणं हे शासनाच्या विचार न करण्याचं लक्षण आहे.
जेम्स लेन यांना जे लिहायचं होतं ते त्यांनी लिहिलं आणि त्यांच्या देशात या पुस्तकावर बंदी नाही. त्यामुळे तिथे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधितच आहे. राहता राहिला प्रश्न भारतीय विचारवंतांच्या विचार-स्वातंत्र्याचा आणि त्या स्वातंत्र्याची अभिव्यक्ती करण्याचा. तो विचार केंद्रस्थानी ठेवून इथल्या विचारवंतांनी या सा-या घटनेला तपासावयास हवं असं वाटतं. कारण ज्या पध्दतीनं जेम्स लेनच्या निमित्तानं प्रवीण गायकवाड सदृश नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू बघतात, त्यांना कायद्यानं वेळीच आवरणं गरजेचं आहे.
धर्माच्या अभ्यासाची पार्श्वभूमी :
ज्या पुस्तकाबद्दल इतका वाद झाला त्या पुस्तकाच्या लेखकानं मांडलेला उद्देश आणि हेतू समजून घेणं आणि त्या संदर्भात त्याच्या आक्षेपार्ह विधानांचा विचार करणे आवश्यक आहे.रिलिजस स्टडीज- म्हणजे धर्माच्या अभ्यासाची सुरुवात मध्ययुगीन युरोपात झाली. मात्र त्यावेळी धर्माचा अभ्यास करणारे अभ्यासक स्वत: धर्माचं पालन करणारे होते, म्हणून मध्ययुगीन धर्माभ्यास हा 'थिऑलॉजी' या प्रकारात मोडतो.
आधुनिक काळात ज्ञानशास्त्रात 'विवेककेंद्री' विचारांनी प्रवेश केला. मध्ययुगीन परमेश्वरकेंद्री विश्वव्यवस्थेकडून 'रिझन', विवेककेंद्री, पर्यायानं मनुष्यकेंद्री विचारसरणीकडे युरोपातील विचारवंतांचा प्रवास झाला. या प्रवासातल्या विविध टप्प्यांवर धर्माचं समाजातील स्थान, धर्म आणि राजसत्ता यांचा परस्परसंबंध, आधुनिकता आणि धर्मसंकल्पना यांचा परस्परसंबंध याबाबत वैचारिक घडामोडी झाल्या. कांटचा समकालीन श्लायरमाखर यांच्या पासून ते ऑटो, मर्सिआ एलियाडा यांसारख्या धर्माच्या अभ्यासकांच्या लेखनाकडे आपल्याला या धर्माभ्यासाचा इतिहास तपासताना पाहावं लागतं. 'सेक्युलॅरिझम' या विचारप्रणालीच्या उदयानंतर लोकशाही व्यवस्थेत धर्माचा अभ्यास सेक्युलर पध्दतीनं करणं शक्य आहे का? असा प्रश्न अभ्यासकांच्या समोर आला. आणि या प्रश्नाला उत्तर देताना, विशेषत: अमेरिकेत 'रिलिजन' आणि 'रिलिजस स्टडीज' या विभागांची स्थापना झाली. या विषयांचे अभ्यासक 'धर्मनिरपेक्षतेने धर्माचा/धार्मिकतेचा अभ्यास करण्यात गुंतले.
भारतामध्ये धर्माचा अभ्यास करणारी अशा प्रकारची डिपार्टमेंट्स नाहीत. आपल्याकडील धर्मांचा अभ्यास हा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विभागांतून होतो. स्वातंत्र्योत्तर भारतात, अमेरिकेतून हिंदू धर्माचा अभ्यास करणारे तसेच मुस्लिम धर्माचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक भारतात आले. डायना एक, जॅक हॉली, लिंडा हेस, वेंडी डोनिंजर- यांच्यासारखे विद्वान अभ्यासक भारतीय हिंदू धर्माचा अभ्यास करायला भारतात आले. तसेच ब्रूस लॅरेन्स, सिंथिया टालबॉट, कार्ल अर्न्स्ट या विद्वानांनी भारतीय इस्लामचा अभ्यास केला.
जेम्स लेन यांच्या लेखनाचा विचार या पार्श्वभूमीवर करणं आवश्यक आहे. याच अभ्यासकांच्या नंतरच्या पिढीत जेम्स लेन यांचा समावेश होतो.
वाद पुस्तकाचा :
नव्वदच्या दशकाच्या अगोदर भारतातील 'हिंदू' धर्माच्या अभ्यासाला साठीच्या 'बीट जनरेशन'चा गुलाबी चष्मा होता. भारतीय आध्यात्मिक परंपरांचा, जगण्याचा, व्रतवैकल्यांचा इथल्या रामायण-महाभारताला 'अप्रिशिएट' करण्याच्या उद्देशाने भरपूर अभ्यास करण्यात आला. मात्र नव्वदनंतर, बाबरी मशीद पडल्यानंतर आणि त्यापूर्वी काही काळ हे सारं समीकरण बदललं. भाजपाच्या उदयानंतर 'हिंदू' धर्माचा भारतातील राजकीय वापर वाढू लागला आणि अनेक देशी, विदेशी अभ्यासक हे 'हिंदू'- 'हिंदुत्ववाद' या संकल्पनांच्या अभ्यासात गुंतले.
सुमित सरकार, तानिका सरकार, सुदिप्त कावराज, ग्यान पांडे, पार्थ चॅटर्जी, ग्यान प्रकाश यांच्यासारखे भारतीय समाजचिंतक यांनी 'हिंदुत्व’या संकल्पनेचा ऐतिहासिक अन्वय लावणारे ग्रंथ लिहिले. आणि रिलिजस स्टडीजच्या, अँथ्रोपॉलॉजीच्या चष्म्यातून लेखन करणा-या परदेशी विद्वानांनी नव्वदच्या दशकात शिवसेना, भाजपप्रणित 'हिंदू राष्ट्रवाद’ची चिकित्सा केली.
यांतलं महत्त्वाचं नाव म्हणजे पीटर व्हॅन डेअर विअर यांचं. त्यांचा 'रिलिजस नॅशनॅलिझम' या पुस्तकानं भाजपप्रणीत हिंदू धर्माच्या राजकीय वापराची समीक्षा केली. अमेरिकन अॅकॅडमिक्सला जाचक वाटणारा मार्क्सवादी चष्मा युरोपीय विचारवंतांना अडचणीचा वाटत नव्हता. डॉ. सुजाता पटेल यांनी 1992 च्या डिसेंबरमध्ये एस.एन.डी.टी.त 'बॉम्बे सेमिनार'चे (हो, 92 साली मुंबई ही 'बॉम्बे'च होती.) आयोजन केले होते. बाबरी मशिदीच्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर हा सेमिनार झाला होता आणि मुंबईवरच्या शिवसेनेच्या पकडीची चर्चा या सेमिनारच्या केंद्रस्थानी होती.
हे सारं विस्तारानं सांगायचं कारण म्हणजे या काळात 'शिवसेनेनं केलेला शिवचरित्राचा वापर' देशी तसेच विदेशी अभ्यासकांच्या विचारांच्या केंद्रस्थानी आला आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मुस्लिम द्वेषासाठी केला जाणारा वापर यावर त्यानंतर अनेकांनी लेखन केलं आहे. ज्यांना या विषयावर अधिक वाचायचं आहे त्यांनी थॉमस ब्लोम हानसेन यांचं 'वेजेस ऑफ व्हायलन्स : नेमिंग ऍण्ड आयडेंटीटी इन पोस्टकलोनिअल बॉम्बे' हे पुस्तक जरूर वाचावं. माझ्या मते, जेम्स लेन यांच्या पुस्तकातील ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाचं विश्लेषण थॉमस ब्लॉम हानसेन यांच्या पुस्तकात आहेत.
लेन यांचं पुस्तक छोटेखानी, केवळ 105 पानांचं आहे. अनेक विद्वान आणि अभ्यासू इतिहासकारांना त्यात अनेक प्रॉब्लेम्स आहेत हे दिसलेलं आहे. लेन यांचा उद्देश सरळ आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर समकालीन राजकारणात शिवसेनेकडून (आणि आता मराठा महासंघाकडून) केला जातो. या चरित्राचा 'हिंदू/ हिंदुत्ववादी ' अर्थ लावल्यामुळे शिवाजी महाराजांचं चरित्र हे 'चांगली विरूध्द वाईट' अशा प्रकारच्या लढाईचं प्रतीक होतं. यात 'वाईट' बाजूला अफझल खान, शाईस्तेखान, औरंगजेब हे मुस्लिम नेते असल्यामुळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर भारतातील मुस्लिम विद्वेष वाढवण्यासाठी होतो. म्हणून ही शिवचरित्राची, 'हिंदुत्ववादी मिथ' तपासून मोडून काढली तर त्याचा वापर करणा-या शिवसेनेच्या पोकळ डोला-याची समीक्षा होऊ शकेल असे प्राध्यापक लेन यांचे एक उद्दिष्ट असावं असा विचार त्यांच्या लेखनातून व्यक्त होतो.
पुस्तकाचा आरंभ मायकेल फुको या तत्त्वचिंतकाच्या वाक्याने होतो. 'These pre existing forms of continuity. (..).. they must not be rejected definitively of course, but tranquility with which they are accepted must be disturbed; we must show that they do not come about of themselves, but are always the result of a construction the rules of which must be known, and justifications of which must be scrutinized.
मराठी अस्मितेची घडी जर शिवचरित्राच्या महाकाव्यातून प्रेरणा घेते - तर त्या महाकाव्यातील नायकाच्या 'मिथ'ला तपासलं, त्याच्या 'मिथ'ला खिंडारं पाडून बघितली तर अधिक खुला, माणूसपणाचा विचार समोर येईल असा भाव लेन यांच्या लेखनातून प्रतीत होतो. ज्या वाक्याबद्दल अनेकांना आक्षेप आहे ते वाक्यही पुस्तकात 'ऐतिहासिक सत्य' म्हणून येत नाही, तर शिवाजी महाराजांच्या संदर्भातील मिथचा एक भाग म्हणून त्याचा उल्लेख येतो. मात्र ते मांडण्याची लेन यांची पद्धत आक्षेपार्ह आहे.
पुस्तकातील पाचव्या प्रकरणाचं नाव आहे 'क्रॅक्स इन द नॅरेटिव्ह'. शिवाजी महाराजांच्या चरित्राला तपासताना, शिवाजी महाराजांकडे 'माणूस' म्हणून पाहताना-- त्यांना 'दैवत' म्हणून जे बघतात त्यांना अस्वस्थ करतील असे प्रश्न प्राध्यापक लेन विचारतात. त्यांचा उद्देश ऐतिहासिक सत्याकडे निर्देश करणं असा नसून शिवाजी महाराजांचं ब्राह्मणी- हिंदुत्वीकरण नाकारणं असा आहे हे जाणवतं. शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणा-या ग्रँड फचा आधुनिक अवतार होणं हे जेम्स लेन यांचं उद्दिष्ट नाही असं ते स्वत:च लिहितात. मात्र ते वावडी स्वरूपी वाक्याचा उल्लेख एका 'मिथ'चं भंजन करण्यासाठी ते करतात. शिवरायांची 'मिथ' आणि शिवरायांचं वास्तव यांचा पगडा मराठी समाजमनावर असल्यामुळे अशा वावडी वाक्यानं समाजमन घायाळ होईल याची कोणतीच जाणीव लेन यांनी बाळगलेली नाही.
लेन यांची चूक लक्षात घेतल्या नंतरही काहीं तथ्यांकडे आपल्याला बघावे लागेल. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वापर करून महाराष्ट्रात मुस्लिम जनतेवर अन्याय केला जातो, हे क्रूर सत्य आपण सर्वांनी प्रथमत: नीट बघायला हवं आणि स्वीकारायलाही हवं. परवा परवा, मिरजेत झालेल्या दंगलीत ज्या पध्दतीनं 'अफजल खान' यांची 'मिथ' वापरली गेली ते बघता शिवाजी महाराजांच्या मायथॉलॉजीचं शिवसेनेनं जे हिंदुत्वीकरण केलं आहे त्याकडे गांभीर्यानं बघावं लागेल.
मात्र तरीही काही प्रश्न लेन यांच्या संशोधन-लेखन पध्दतीत पडतातच. त्या प्रश्नांमुळे त्यांची पध्दत मला आक्षेपार्ह वाटते. मात्र या आक्षेपांना नोंदवताना या पुस्तकाचा प्रकाशित होण्याचा हक्क मान्य करावा. त्यावर बंदी घालू नये असं माझं मत आहे. बंदी हा शासनाचा पळपुटेपणा आहे.
शिवाजी महाराजांच्या चरित्राचा मुस्लिम विद्वेषासाठी वापर शिवसेनेनं केला आहे. दरम्यानच्या काळात बाबासाहेब पुरंदरे जनरेशनपलीकडे, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड यांनी 'सेना-मॉडेल'चाच वापर सुरू केला आहे. शिवसेनेच्या ओबीसी राजकारणानं हबकून एकीकडून मराठा आरक्षण आणि दुसरीकडून मराठा-जातीय अस्मितेचं अधोरेखन या मराठा जातीय संघटनांनी केलं आहे. कोणत्याही राजकीय, जातीय, धार्मिक पक्षाला आपलं अस्तित्व दाखवायला पायाभूत हिंसेचा प्रयोग करावाच लागतो. शिवसेनेनं तो 69 मध्ये आणि नंतर 84 मध्ये भिवंडी दंगलीत केला. जेम्स लेन यांचं पुस्तक ब्रिगेड आणि महासंघाच्या राजकीय उदयाच्या वेळी प्रकाशित झालं आणि वादाच्या भोव-यात सापडलं. आत्यंतिक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शरद पवारांसारख्या पुरोगामी नेतृत्वानं या जातीय संघटनांना काबूत ठेवलेलं नाही. काहूर उठवणा-या अशा प्रश्नांवर आर.आर. पाटील भावनिक विधानं करतात, मात्र शरद पवार कोणतीही भूमिका मांडत नाहीत- हे असं राजकारण दुर्दैवी आहे. त्यामुळेच प्रियांका भोतमांगे च्या निकालापेक्षा जास्त प्रतिक्रिया लेनच्या पुस्तकावर उमटते, असं महाराष्ट्राचं दुर्दैवी वास्तव आहे.
‘आयबीएन-लोकमत’च्या चर्चेत जतीन देसाई यांनी म्हटल्याप्रमाणे,या पुस्तकाचा सर्वाधिक उपयोग संभाजी ब्रिगेड, मराठा-जातीयवादी संघटना आणि सेना यांनी केला आहे. जेम्स लेन यांचा उद्देशच मायकेल फुको यांनी म्हटल्याप्रमाणे 'थोडंसं डिस्टर्ब करून त्यातून नवीन प्रश्न निर्माण करण्याचा होता.' मात्र शिवाजी महाराजांचं चरित्र या त-हेच्या अॅकॅडमिक ट्रीटमेंटसाठी उपयुक्त होतं का? या प्रश्नाचं उत्तर मी नकारार्थी देते. म्हणून ज्याला आपण 'काऊंटर प्रॉडक्टिव्ह' म्हणू असा 'करायला गेलो एक आणि झालं नेमकं जे व्हायला नको होतं तेच' असा परिणाम या पुस्तकाचा झाला आहे. ब्राह्मण -ब्राह्मणेत्तर तेढ वाढण्यात त्याची परिणती झाली आहे.
तिढा अॅकॅडमिक आरग्युमेंटचा :
शिवसेनेनं केलेला शिवरायांचा वापर खरोखर अंगावर काटा आणणारा आहे. परंतु शिवसेनेचा विरोध करण्यासाठी शिवरायांच्या 'मिथ'चं भंजन करायचं, पर्यायानं शिवसेनेनं केलेला चुकीचा वापर दाखवून द्यायचा हा प्रयत्न खोचक, दुखावणारा आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे बघता अनाठायी आणि दुर्दैवी आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले अनेक निर्णय केवळ 'हिंदू-मुस्लिम' समकालीन तथाकथित तेढीच्या पलीकडचे होते. 'मुस्लिम द्वेष' ही शिवाजी महाराजांच्या मूळ चरित्रातून सामोरी येणारी धारणा नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, त्यांच्या चरित्रातील घटनांचा महाराष्ट्रात खरंतर पॉझिटिव्ह वापर शक्य आहे. शिवाजी महाराजांचा उदारमतवाद सेनेच्या हिंदुत्वीकरणाला आणि ब्रिगेडच्या जातीय राजकारणात पुरून उरणारा अहे. म्हणूनच लेनची मीमांसापध्दत मला उपयुक्त वाटत नाही. लेन पध्दतीचं प्रोव्होकेटिव्ह, उसकवणारं मूर्तिभंजन मला टीकापात्र वाटतं.
दुसरं म्हणजे शिवसेनाप्रणीत राजकारणाचा मृत्यू तूर्तास त्यांच्याच कर्मानं होत आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी, की महाराष्ट्रातील मराठा जातीय राजकारणाच्या विरूद्ध महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे परंपरागत डाव्यांनी ज्या पध्दतीनं शिवसेनेकडे 'धर की धोपट' चष्म्यातून बघितलं त्या चष्म्यानं बघून महाराष्ट्रातील राजकीय तिढे सुटत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला मराठवाड्यात सेनेनं चाप लावले, ते बघता शिवसेनेची सांस्कृतिक भूमिका चुकीच्या पायांवर उभी असली तरी त्यांच्या राजकीय उपयोगाचा विचार करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मराठा जातीय संघटना आता 'खरे शिवाजी महाराज' आमचेच आहेत असं, राजकीय उपयोगापोटी का म्हणत आहेत हे आपण ध्यानात घेणं आवश्यक आहे.
शिवसेनेचं डिकन्स्ट्रक्शन, त्यांच्या ‘आदेश’ राजकारणाची टीका थेट करता येते. असं असताना शिवरायांच्या संदर्भात कोणत्याही मराठी माणसाला अनुचित वाटतील अशा वावडीस्वरूपी उद्गारांना अॅकॅडमिक जागा देण्याची चूक लेन यांनी केली आहे.
मायकेल फुकोचंचं एक पुस्तक आहे. पॉवर/नॉलेज. ज्ञान आणि सत्ता यांचा परस्परसंबंध फुको ऐतिहासिक/ज्ञानशास्त्रीय घडणीतून उलगडून दाखवतो. मला वाटतं, की जेम्स लेन यांची पोझिशन - अमेरिकेतील एक संशोधक असणं हीच एक पॉवर पोझिशन आहे. आपण एका वावडीचा जर अॅकॅडमिक वापर करत असू तर त्यातून काय होऊ शकतं हे न कळण्याजोगे जेम्स लेन हे भाबडे सदगृहस्थ नाहीत. या संहितेत अध्यहृत जो जाणीवपूर्वक उस्कावण्याचा प्रयोग आहे तो अॅकॅडमिक शिस्तीला धरून नाही. यामुळे आपण ज्या समाजाचा अभ्यास करतो त्यांना आपण कमी/गृहित लेखतो असा अर्थ प्रतीत होतो. त्या समाजाबद्दल आपण बेदरकार आहोत हे त्यातून प्रतीत होतं.
'हिंदू' या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत जेम्स लेन यांनी ज्या प्रकारची उत्तरं दिली आहेत ती बघता हे पुस्तक त्यांनी 'सेक्युलर' भूमिकेतून लिहिलं आहे की एक प्रकारच्या वसाहतवादी उध्दटपणातून लिहिलं आहे हे तपासावं लागेल, त्याची अॅकॅडमिक चिकित्सा होणं आवश्यक आहे. भारतीय वास्तवाचा अभ्यास करणा-या परदेशी अभ्यासकांना अनेक काळ 'बाबा वाक्यं प्रमाणम' सारखं आम्ही स्वीकारलं आहे. परंतु आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची वैचारिक लढाई चालू ठेवताना या स्वातंत्र्याची दुसरी बाजू म्हणजे भारतीय समाजाच्या संदर्भात देशी/ विदेशी अभ्यासकांची जी अॅकॅडमिक जबाबदारी आहे ती सुध्दा आपल्याला मांडावी लागेल, अधोरेखित करावी लागेल.
एक लेखक म्हणून वैचारिक स्वातंत्र्याचा आग्रह शंभर टक्के धरावाच लागेल. समाजाला सोयिस्कर, जैसे थे वादी ठेवणं हे विचारवंतांचं काम नाही. त्यांना अस्वस्थ करणं, विचार करायला लावणं हे विचारवंतांचं काम आहे. परंतु हे करताना माणूसपणाच्या भूमिकेवर अॅकॅडमिक संवेदनशीलता जागी राहते की नाही याचं भानही हवं. जेम्स लेन यांच्या लेखनात आवेश आणि अॅकॅडमिक प्रकल्पाला आवश्यक ऊर्जा आहे. मात्र अशी संहिता समाजावर जे परिणाम घडवते त्याची कोणतीही जबाबदारी त्यांना घ्यायची नाही. शिवाय, त्यांच्या लेखनाचा उद्देश ज्या संघटनांना दुर्बळ करणं हा होता तसं न होता उलट, त्या संघटना अधिक त्वेषानं याच पुस्तकाचा वापर करून बलवान होताना दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात या जातीय राजकारणाची चिकित्सा होणं आवश्यक आहे. जेम्स लेन यांच्या काही वाक्यांची आणि त्यांच्या संशोधन पध्दतीचा निषेध करण्यासोबत सेना-ब्रिगेड-महासंघाच्या हिंसेचा निषेधही होणं आवश्यक आहे. त्यांच्या आक्रस्ताळ्या प्रतिक्रियांना कायदेशीर चाप बसवण्याची आवश्यकता आहे. आपलं बोटचेपं शासन बंदी घालण्याचा उत्साह दाखवताना या संघटनांचा पध्दतशीर वापर करून घेतं, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. संघराज रूपवते, कुंदा प्रमिला नीळकंठ आणि आनंद पटवर्धन यांनी आविष्कारस्वातंत्र्याची बाजू लावून धरली आहे. आता गरज आहे चिकित्सक अभ्यासाची. आपल्या इतिहासातल्या ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वादाच्या, हिंदू-मुस्लिम विद्वेषाच्या, अस्मितेच्या क्रूर राजकारणाच्या दुख-या जागी जेम्स लेनच्या पुस्तकानं जाणूनबुजून सुई खुपसलीय. त्याचा राजकीय वापर होऊ द्यायचा की मूळ जखमा कशा भरून येतील ते बघायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. शाहू महाराजांच्या, विठ्ठल रामजी शिंद्यांच्या, राजारामशास्त्री भागवतांच्या भूमीत हे अशक्य नाही.
Friday, July 16, 2010
Thursday, July 15, 2010
आगुस्तो ब्वाल अणि त्याचे नाटक
http://www.loksatta.com/old/daily/20061126/sun02.htm
Found my old article on Loksatta's website! It was published on November 26 , 2006. I think its relevant to revisit Boal's theatre in India. I had attended his workshop in Kolkata in 2006.
Boal claims that democracy and theatre are both participative processes. I think it would be extremely relevant in the present context to engage citizens in such participatory activity!
Anyway-- old thought for a new day. In the first photograph on the extreme right is Augusto Boal. And the next photo is that of the performance in Kolkata.
Friday, July 9, 2010
महाराष्ट्र देशी असावे!
अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुसयांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं अंगण तपासायला गेले. ख्रिश्चन मिशनरी आणि वसाहतींमधले उच्च अधिकारी यांनी 'एम्पायर'च्या गरजेपोटी जगभरातल्या संस्कृतींचा अभ्यास सुरू केला. डार्विनच्या उत्क्रांतीच्या मॅपवर स्वत:ला सर्वात 'प्रगत' समजणा-या गो-या, युरोपीयन साहेबांनी या शास्त्राचा पाया रचला. या पहिल्या फळीतल्या रिस्ले ते एल्विन या पिढ्यांनंतर भारतात भारतीय अंगणाचा अभ्यास करणारे अँथ्रॉपोलिजिस्ट आले. धुर्ये, इरावती कर्वे ते अगदी कमला गणेशपर्यंत प्रत्येक भारतीय अँथ्रॉपोलिजिस्टनं स्वत:ची संस्कृती तपासलेली आपल्याला दिसते. यांतली दोन महत्त्वाची नावं म्हणजे दुर्गाबाई भागवत आणि इरावती. आणि या दोघींमध्ये त्यांच्यातील भेदांपलीकडे एक समान दुवा म्हणजे 'मराठी असणे ऊर्फ मराठीनेस' या वास्तवाकडे दोघींची वळलेली नजर.
इरावती कर्व्यांच्या लेखात भेटणारा भैयाची घोंगडी फेकून दिली तरी त्यातल्या पैशाला हात न लावणारा नफ्फट, तर्कट मराठी माणूस किंवा दुर्गाबाईंच्या नजरेनं टिपल्या जाणा-या मराठीपणाच्या, वारकरी भक्तीच्या, धनगरांच्या बारीक घडणी या दोन्ही वाचणं आणि अभ्यासणं मनोहारी आणि अभ्यासपूर्ण; म्हणून महत्त्वाचं.
या मराठीपणाकडे नंतर जगभरातून येणा-या अँथ्रॉपोलिजिस्टांची नजर वळली. धुर्ये पिढीनं महाराष्ट्रातले भिल्ल, कातकरी, महादेव, कोळी इत्यादी तमाम आदिवासी गटांना पिंजून काढल्यानंतर प्रादेशिक अस्मितांच्या जातीय गटांच्या घडणीचा अभ्यास त्यानंतरच्या फळीला महत्त्वाचा वाटला.
गुंथर सोन्थायमरनं केलेला महाराष्ट्रातील धनगरांचा, वारीचा अभ्यास किंवा अँन फेल्डहाऊसनं चक्रधरांच्या महानुभाव पंथाकडून 'मराठीनेस'च्या अभ्यासात मारलेली उडी या गोष्टी ऐंशीच्या दशकात महत्त्वाच्या होत्या. या दोघांनी त्यांच्या गो-या नजरेनं 'मराठीनेस' सोलला. त्यात अँन फेल्डहाऊसनं केवळ अँथ्रॉपोलिजी नव्हे तर 'रिलिजिस स्टडीज'ची अभ्यासपूर्ण लेन्स वापरून महाराष्ट्र देशी राहणा-या देव-देवतांची, नद्यांची, जत्रांची चिकित्सा केली. मराठी असण्याचा सांस्कृतिक धर्म तिने तपासाला. Encyclopedia of Religion मध्ये अँन फेल्डहाऊसनं लिहिलेली मराठी संस्कृतीची एन्ट्री यासाठी वाचायला हवी.
माझ्या अँकॅडमिक प्रवासातले दोन योगायोग मला कायम महत्त्वाचे वाटले आहेत. पहिला जेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमधली लेक्चर्स बुडवून मी एशियाटिकला वाचत बसायचे तेव्हा माझी दुर्गाबाई भागवतांशी ओळख झाली आणि दोन-तीन भेटींत त्यांनी मला 'तू अँथ्रॉपोलॉजी हा विषय का घेत नाहीस?' असा प्रश्न केला. विविध ज्ञानशाखांतून फिरत असताना 'अँथ्रॉपोलॉजी' ही अत्यंत वसाहतवादी ज्ञानशाखा माझ्या विचारांच्या केंद्रस्थानी राहिली, कारण तो दुर्गाबाईंचा प्रश्न. या विद्याशाखेताला वसाहतवाद सोलून त्यापलीकडे काय करता येईल या प्रश्नानं मला कायम ग्रासलं आणि माझा अभ्यास चालू राहिला.
दुसरी बरी गोष्ट म्हणजे अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत मी अँन फेल्डहाऊसची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला आणि मग टिपिकल दुस-या टाईपच्या अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासकासारखं स्वत:चं बॅकयार्ड उस्कटायला घेतलं. 'मराठी असण्याचं माझं अंगण' हाच मग माझा अभ्यास- विषय झाला.
अँन फेल्डहाऊसनं 60 नंतरच्या 'रोमॅटिक इंडिया' लेन्समधून मराठीपणाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. माझा अभ्यास 92 च्या दंगलीनंतर मुंबईतल्या उद्विग्न मराठीपणाच्या मोमेंटवर सुरू झाला होता. अँनच्या हाताखाली मी जो ग्रॅज्युएट थिसिस लिहिला त्याचं शीर्षक आहे 'लँग्वेज अँण्ड रिलीजन इन महाराष्ट्र'. 92-93च्या दंगली नंतर 'मराठी असणं आणि हिंदू असणं' या दोन्हीतली दरी संपून 'मराठी माणूस = हिंदू माणूस' हे जे नवं समीकरण झालं त्याचा उद्वेग माझ्या मनाच्या तळाशी होता. मी माझ्या मराठी अंगणाकडे काहीशा डाव्या रागानं बघत होते. अँनच्या अँरिझोनामधल्या 'रिलिजस स्टडीज' या डिपार्टमेंटने मात्र मला माझ्या मुंबईतल्या इंटुक सर्किटला आवश्यक 'डाव्या-आवेशा'पासून थोडं दूर जायला जागा दिली. 'मराठीनेस तपासण्यासाठी' तत्कालीन समाजात उपलब्ध rhetoric दूर जायला ती जागा माझ्या उपयोगाला आली.
अँन फेल्डहाऊसमुळे माझी 'मराठीपणाचा इतिहास' तपासणा-या विविध विचारवंतांशी ओळख झाली. त्यांतला डॉ. रिचर्ड इटन यांच्यासोबतचा सेमिनार मला कायम आठवतो. आमच्या डिपार्टमेंटला डॉ. इटन यांनी एक पेपर वाचला होता. त्याचा विषय होता मलिक अंबर. आदिलशहाच्या आईने लहानग्या आदिलशहाला मलिक अंबरच्या मांडीवर दिले आणि त्याने आदिलशाही राबवली हा चौथीच्या पुस्तकातला उल्लेख मला आठवत होता. पण डॉ. इटन यांनी या मलिक अंबरचं सारं राजकीय आणि ऐतिहासिक चरित्र समोर मांडलं.
मलिक अंबर हा मूळचा अँबिसिनियाचा, आफ्रिकन. या अँबिसेनियन्सना आपल्याकडे 'हबशी' म्हणतात. (हैदराबादेत एक हबशीकुडा पण आहे.) तिथून त्याला पकडून इराकला आणला आणि त्याचं धर्मांतर करून नाव ठेवलं मलिक अंबर. त्या काळात वेगवेगळे मुजाहुद्दीन म्हणजे पगारी लढाऊ सैनिक विकत घ्यायची पध्दत होती. तशा गुलाम-मुजाहुद्दीनांच्या बाजारातून आदिलशहाच्या आईनं मलिक अंबरला विकत घेऊन महाराष्ट्रात आणला.
डॉ. इटनच्या भाषणात, त्यांनं महाराष्ट्रातली चौथाई सरदेशमुखीची महसुली पध्दत मलिक अंबरनं त्याच्या आफ्रिकन संस्कृतीतून उसनी आणून महाराष्ट्रात कशी रुजवली यावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. महाराष्ट्रातली महसूल पध्दत, इथले गड-किल्ले यांची रचना या सा-यांत मलिक अंबरचं योगदान मोठं आहे. आदिलशहाच्या अधिपत्याखाली महसुली युनिट म्हणून 'महाराष्ट्र' प्रथम एकत्र झाला. 'मराठी असण्याच्या' प्रक्रियेत एक अँबिसेनिअन दृष्टी अशी मिसळून गेली आहे.
'मराठी' असण्याचा इतिहास शोधताना जगभरातून आलेल्या अशा अनेक गोष्टी भेटत गेल्या. कधी, डॉ. अशोक केळकरांच्या पर्सो मराठीच्या अभ्यासात मराठीतले उझबेकी-तुर्की शब्द सापडले. कधी, 'तमिळ-मराठी' शब्दकोशात इडली ऊर्फ इडरीच्या मराठी जन्माची कथा मिळाली. कधी, पोस्ट-होयसाळ राजांच्या इतिहासातून वाहत आलेला कानडी उच्चभ्रूपणा मराठी शब्दांत भेटला. वेरूळ-अजिंठ्याच्या निर्मितीच्या वेळी बिहारमधून आलेले बौध्द-जैन कारागिर-मेडिटेटर्स यांनी ही मराठी भूमी आपली मानून निर्माण केलेली साडेसातशे लेणी पाहून महाराष्ट्रातल्या स्थलांतराकडे नव्या नजरेनं पाहण्याची सवय लागली. बौध्द वास्तुकलेतून वाहत आलेलं 'तोरण' मराठी दारांवर चढताना संस्कृती किती विविध परंपरांचा संगम पोटात सामावून घेते हे बघून मन भरून आलं.
मला अभ्यास करायचा होता भाषा आणि धर्म या दोन गोष्टी अस्मितेच्या प्रांतात कशा वापरल्या जातात त्याचा. आणि भाषिक अस्मितेचा इतिहास तपासताना भाषा ही कशी अनेक संस्कृतींच्या सरमिसळीतून घडत जाणारी, हवेशीर, खुली, एका भाषेतून दुस-या भाषेत जाणं अवघड न करणारा नात्यांचा ताणाबाणा आहे, या वास्तवाचा परिचय व्हायला लागला.
भाषेला अस्मितेशी जोडणारी आधुनिक नाळ म्हणजे मातृभाषेची संकल्पना. मराठीपणाच्या अभ्यासातली एक पायरी मला अशीच आठवते. ती म्हणजे सुमती रामस्वामी यांच्या तमिळ भाषेच्या अभ्यासादरम्यान भेटलेला एक रेफरन्स. 'मातृभाषा' हा विचारच कसा आधुनिक आहे याची मीमांसा त्यात डॉ. रामस्वामी यांनी केली आहे. भाषेचा राजकीय इतिहास कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. सुमती रामस्वामी यांचं 'पॅशन्स ऑफ द टंग' हे पुस्तक आहे. मातृभाषा आणि त्याला जोडून अस्मितेचं राजकारण हा सारा जर्मन भाषाशास्त्रज्ञांचा भाषेकडे बघण्याचा 'आधुनिक' विचार आहे. मातृभाषा ही संकल्पना आणि त्याला जोडून अस्मितेचे लढे हा आधुनिकतेचा परिपाक आहे असा रामस्वामी याचं म्हणणं आहे. मूळ संस्कृती ही बहुतेकदा बहुभाषिक असते याबद्दल त्यांनी विवेचन केलं आहे. या बहुभाषिकतेचा, बहुकेंद्री अस्मितांचा विसर आपल्याला पडतो ते केवळ भयाचं राजकारण आहे. 'पॅशन्स ऑफ द टंग' तमिळ भाषेच्या संदर्भात हे विवेचन करते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म यांचं अंगण पिंजून काढताना या अंगणात आलेले कित्येक वैश्विक शब्द, विचारप्रवाह, भाषा भेटत गेल्या. त्या तशाच भेटल्या जेव्हा इतर संस्कृतींचे अभ्यासक भेटले. त्या कुणी मराठी खोपा घातलेल्या अफगाण बायका पोस्ट-पानिपत अफगाणिस्तानात कशा फोटोमध्ये बंदिस्त झाल्या त्याची गोष्ट सांगितली. तर कुणी खानखोज्यांसारख्या मराठी असण्याच्या मेक्सिकन खुणांचा परिचय करून दिला.
भयापोटी माणूस संकुचित विचार करतो हे माझं हायपोथिसिस मी गेली कित्येक वर्षे तपासत आहे. अँथ्रॉपोलॉजी, रिलिजस स्टडीज आणि माध्यमांच्या अभ्यासात या भाषेत आणि पर्यायानं संस्कृतीत विणलेले विविध संस्कृतींचे सरमिसळ पदर डोळ्यांना दिसू लागले आहेत.
संस्कृतीचा अभ्यास करताना अनेक सामाजिक शास्त्रज्ञ एक शब्द वापरतात -पालिमसेस्ट- म्हणजे काय? तर भूर्जपत्र. कसं भूर्जपत्रं? तर ज्या भूर्जपत्रावर एक निरोप लिहून झाला, की त्याला पांढरा रंग देऊन त्यावर दुसरा निरोप लिहिता येतो असं- इतिहासाच्या खुणा जपणारं भूर्जपत्र. आणि जर जाणकार हातांनी हा पालिमसेस्ट सोलला तर त्या खाली दडलेले अनेक निरोप वाचता येतात... निदान निरोपांचे अनेक थर इथं अस्तित्वात आहेत याचं भान येतं. अँथ्रॉपोलॉजित संस्कृतीचं स्वरूप या पालिमसेस्टसारखं बहुपदरी मानलंय.
मराठी असण्याबद्दल माझ्या असलेल्या प्रेमाचा परिपाक म्हणून असेल मला सेना-मनसे जेव्हा मराठी असण्याबद्दल बोलतात तेव्हा अंगावर काटा येतो. (अर्थात असाच काटा राष्ट्रवादीच्या पोस्टरवर 'भाषा हे साधन संपर्काचे नाही-संघर्षाचे' हे वाक्य बघितल्यावरही येतो.) कारण या राजकीय पक्षांना भाषेला राबवायचं आहे, वाढवायचं नाही.
बहुकेंद्री असणं हा भाषिक संस्कृतीचा मूळ धर्म आहे. तो भयापोटी नाकारून चालणारं संकुचित राजकारण चुकीचं वाटतं. या राजकीय पक्षांना मुंबईतलं मराठी मायनॉरिटीचं राजकारण कळतं, त्याचबरोबर जागतिकीकरणात डावलल्या गेलेल्या त्रस्त मराठी तरूण मुलांचं भयग्रस्त मन समजतं. मात्र त्यांना ज्ञानोबांनी सांगितलेला 'मराठी' असण्याचा पसायदान अर्थ लागण्याची सुतराम शक्यता नाही. तो अर्थ फार पुढची गोष्ट झाली पण त्यांना मूलभूत मानवी हक्क जपत लोकशाहीवादी राजकारण कसा करायचं हे पण समजून घ्यायचं नाही.
ख-या अर्थानं मराठी असणं म्हणजे आपल्या भूमीत रुजायला पोषक अशी मूलद्रव्यं सर्व संस्कृतींतून घेणं, त्यासाठी खुली धारणा बाळगणं आणि त्या खुलेपणामध्ये अनेकांना सामावून घेणं-- अशा रोबस्ट मराठीपणाच्या राजकारणाची मी वाट पाहतेय. कोंज्या अस्मितेच्या राजकारणाची नाही!
इरावती कर्व्यांच्या लेखात भेटणारा भैयाची घोंगडी फेकून दिली तरी त्यातल्या पैशाला हात न लावणारा नफ्फट, तर्कट मराठी माणूस किंवा दुर्गाबाईंच्या नजरेनं टिपल्या जाणा-या मराठीपणाच्या, वारकरी भक्तीच्या, धनगरांच्या बारीक घडणी या दोन्ही वाचणं आणि अभ्यासणं मनोहारी आणि अभ्यासपूर्ण; म्हणून महत्त्वाचं.
या मराठीपणाकडे नंतर जगभरातून येणा-या अँथ्रॉपोलिजिस्टांची नजर वळली. धुर्ये पिढीनं महाराष्ट्रातले भिल्ल, कातकरी, महादेव, कोळी इत्यादी तमाम आदिवासी गटांना पिंजून काढल्यानंतर प्रादेशिक अस्मितांच्या जातीय गटांच्या घडणीचा अभ्यास त्यानंतरच्या फळीला महत्त्वाचा वाटला.
गुंथर सोन्थायमरनं केलेला महाराष्ट्रातील धनगरांचा, वारीचा अभ्यास किंवा अँन फेल्डहाऊसनं चक्रधरांच्या महानुभाव पंथाकडून 'मराठीनेस'च्या अभ्यासात मारलेली उडी या गोष्टी ऐंशीच्या दशकात महत्त्वाच्या होत्या. या दोघांनी त्यांच्या गो-या नजरेनं 'मराठीनेस' सोलला. त्यात अँन फेल्डहाऊसनं केवळ अँथ्रॉपोलिजी नव्हे तर 'रिलिजिस स्टडीज'ची अभ्यासपूर्ण लेन्स वापरून महाराष्ट्र देशी राहणा-या देव-देवतांची, नद्यांची, जत्रांची चिकित्सा केली. मराठी असण्याचा सांस्कृतिक धर्म तिने तपासाला. Encyclopedia of Religion मध्ये अँन फेल्डहाऊसनं लिहिलेली मराठी संस्कृतीची एन्ट्री यासाठी वाचायला हवी.
माझ्या अँकॅडमिक प्रवासातले दोन योगायोग मला कायम महत्त्वाचे वाटले आहेत. पहिला जेव्हा एल्फिन्स्टन कॉलेजमधली लेक्चर्स बुडवून मी एशियाटिकला वाचत बसायचे तेव्हा माझी दुर्गाबाई भागवतांशी ओळख झाली आणि दोन-तीन भेटींत त्यांनी मला 'तू अँथ्रॉपोलॉजी हा विषय का घेत नाहीस?' असा प्रश्न केला. विविध ज्ञानशाखांतून फिरत असताना 'अँथ्रॉपोलॉजी' ही अत्यंत वसाहतवादी ज्ञानशाखा माझ्या विचारांच्या केंद्रस्थानी राहिली, कारण तो दुर्गाबाईंचा प्रश्न. या विद्याशाखेताला वसाहतवाद सोलून त्यापलीकडे काय करता येईल या प्रश्नानं मला कायम ग्रासलं आणि माझा अभ्यास चालू राहिला.
दुसरी बरी गोष्ट म्हणजे अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीत मी अँन फेल्डहाऊसची विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला आणि मग टिपिकल दुस-या टाईपच्या अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासकासारखं स्वत:चं बॅकयार्ड उस्कटायला घेतलं. 'मराठी असण्याचं माझं अंगण' हाच मग माझा अभ्यास- विषय झाला.
अँन फेल्डहाऊसनं 60 नंतरच्या 'रोमॅटिक इंडिया' लेन्समधून मराठीपणाच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. माझा अभ्यास 92 च्या दंगलीनंतर मुंबईतल्या उद्विग्न मराठीपणाच्या मोमेंटवर सुरू झाला होता. अँनच्या हाताखाली मी जो ग्रॅज्युएट थिसिस लिहिला त्याचं शीर्षक आहे 'लँग्वेज अँण्ड रिलीजन इन महाराष्ट्र'. 92-93च्या दंगली नंतर 'मराठी असणं आणि हिंदू असणं' या दोन्हीतली दरी संपून 'मराठी माणूस = हिंदू माणूस' हे जे नवं समीकरण झालं त्याचा उद्वेग माझ्या मनाच्या तळाशी होता. मी माझ्या मराठी अंगणाकडे काहीशा डाव्या रागानं बघत होते. अँनच्या अँरिझोनामधल्या 'रिलिजस स्टडीज' या डिपार्टमेंटने मात्र मला माझ्या मुंबईतल्या इंटुक सर्किटला आवश्यक 'डाव्या-आवेशा'पासून थोडं दूर जायला जागा दिली. 'मराठीनेस तपासण्यासाठी' तत्कालीन समाजात उपलब्ध rhetoric दूर जायला ती जागा माझ्या उपयोगाला आली.
अँन फेल्डहाऊसमुळे माझी 'मराठीपणाचा इतिहास' तपासणा-या विविध विचारवंतांशी ओळख झाली. त्यांतला डॉ. रिचर्ड इटन यांच्यासोबतचा सेमिनार मला कायम आठवतो. आमच्या डिपार्टमेंटला डॉ. इटन यांनी एक पेपर वाचला होता. त्याचा विषय होता मलिक अंबर. आदिलशहाच्या आईने लहानग्या आदिलशहाला मलिक अंबरच्या मांडीवर दिले आणि त्याने आदिलशाही राबवली हा चौथीच्या पुस्तकातला उल्लेख मला आठवत होता. पण डॉ. इटन यांनी या मलिक अंबरचं सारं राजकीय आणि ऐतिहासिक चरित्र समोर मांडलं.
मलिक अंबर हा मूळचा अँबिसिनियाचा, आफ्रिकन. या अँबिसेनियन्सना आपल्याकडे 'हबशी' म्हणतात. (हैदराबादेत एक हबशीकुडा पण आहे.) तिथून त्याला पकडून इराकला आणला आणि त्याचं धर्मांतर करून नाव ठेवलं मलिक अंबर. त्या काळात वेगवेगळे मुजाहुद्दीन म्हणजे पगारी लढाऊ सैनिक विकत घ्यायची पध्दत होती. तशा गुलाम-मुजाहुद्दीनांच्या बाजारातून आदिलशहाच्या आईनं मलिक अंबरला विकत घेऊन महाराष्ट्रात आणला.
डॉ. इटनच्या भाषणात, त्यांनं महाराष्ट्रातली चौथाई सरदेशमुखीची महसुली पध्दत मलिक अंबरनं त्याच्या आफ्रिकन संस्कृतीतून उसनी आणून महाराष्ट्रात कशी रुजवली यावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. महाराष्ट्रातली महसूल पध्दत, इथले गड-किल्ले यांची रचना या सा-यांत मलिक अंबरचं योगदान मोठं आहे. आदिलशहाच्या अधिपत्याखाली महसुली युनिट म्हणून 'महाराष्ट्र' प्रथम एकत्र झाला. 'मराठी असण्याच्या' प्रक्रियेत एक अँबिसेनिअन दृष्टी अशी मिसळून गेली आहे.
'मराठी' असण्याचा इतिहास शोधताना जगभरातून आलेल्या अशा अनेक गोष्टी भेटत गेल्या. कधी, डॉ. अशोक केळकरांच्या पर्सो मराठीच्या अभ्यासात मराठीतले उझबेकी-तुर्की शब्द सापडले. कधी, 'तमिळ-मराठी' शब्दकोशात इडली ऊर्फ इडरीच्या मराठी जन्माची कथा मिळाली. कधी, पोस्ट-होयसाळ राजांच्या इतिहासातून वाहत आलेला कानडी उच्चभ्रूपणा मराठी शब्दांत भेटला. वेरूळ-अजिंठ्याच्या निर्मितीच्या वेळी बिहारमधून आलेले बौध्द-जैन कारागिर-मेडिटेटर्स यांनी ही मराठी भूमी आपली मानून निर्माण केलेली साडेसातशे लेणी पाहून महाराष्ट्रातल्या स्थलांतराकडे नव्या नजरेनं पाहण्याची सवय लागली. बौध्द वास्तुकलेतून वाहत आलेलं 'तोरण' मराठी दारांवर चढताना संस्कृती किती विविध परंपरांचा संगम पोटात सामावून घेते हे बघून मन भरून आलं.
मला अभ्यास करायचा होता भाषा आणि धर्म या दोन गोष्टी अस्मितेच्या प्रांतात कशा वापरल्या जातात त्याचा. आणि भाषिक अस्मितेचा इतिहास तपासताना भाषा ही कशी अनेक संस्कृतींच्या सरमिसळीतून घडत जाणारी, हवेशीर, खुली, एका भाषेतून दुस-या भाषेत जाणं अवघड न करणारा नात्यांचा ताणाबाणा आहे, या वास्तवाचा परिचय व्हायला लागला.
भाषेला अस्मितेशी जोडणारी आधुनिक नाळ म्हणजे मातृभाषेची संकल्पना. मराठीपणाच्या अभ्यासातली एक पायरी मला अशीच आठवते. ती म्हणजे सुमती रामस्वामी यांच्या तमिळ भाषेच्या अभ्यासादरम्यान भेटलेला एक रेफरन्स. 'मातृभाषा' हा विचारच कसा आधुनिक आहे याची मीमांसा त्यात डॉ. रामस्वामी यांनी केली आहे. भाषेचा राजकीय इतिहास कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणजे डॉ. सुमती रामस्वामी यांचं 'पॅशन्स ऑफ द टंग' हे पुस्तक आहे. मातृभाषा आणि त्याला जोडून अस्मितेचं राजकारण हा सारा जर्मन भाषाशास्त्रज्ञांचा भाषेकडे बघण्याचा 'आधुनिक' विचार आहे. मातृभाषा ही संकल्पना आणि त्याला जोडून अस्मितेचे लढे हा आधुनिकतेचा परिपाक आहे असा रामस्वामी याचं म्हणणं आहे. मूळ संस्कृती ही बहुतेकदा बहुभाषिक असते याबद्दल त्यांनी विवेचन केलं आहे. या बहुभाषिकतेचा, बहुकेंद्री अस्मितांचा विसर आपल्याला पडतो ते केवळ भयाचं राजकारण आहे. 'पॅशन्स ऑफ द टंग' तमिळ भाषेच्या संदर्भात हे विवेचन करते.
मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म यांचं अंगण पिंजून काढताना या अंगणात आलेले कित्येक वैश्विक शब्द, विचारप्रवाह, भाषा भेटत गेल्या. त्या तशाच भेटल्या जेव्हा इतर संस्कृतींचे अभ्यासक भेटले. त्या कुणी मराठी खोपा घातलेल्या अफगाण बायका पोस्ट-पानिपत अफगाणिस्तानात कशा फोटोमध्ये बंदिस्त झाल्या त्याची गोष्ट सांगितली. तर कुणी खानखोज्यांसारख्या मराठी असण्याच्या मेक्सिकन खुणांचा परिचय करून दिला.
भयापोटी माणूस संकुचित विचार करतो हे माझं हायपोथिसिस मी गेली कित्येक वर्षे तपासत आहे. अँथ्रॉपोलॉजी, रिलिजस स्टडीज आणि माध्यमांच्या अभ्यासात या भाषेत आणि पर्यायानं संस्कृतीत विणलेले विविध संस्कृतींचे सरमिसळ पदर डोळ्यांना दिसू लागले आहेत.
संस्कृतीचा अभ्यास करताना अनेक सामाजिक शास्त्रज्ञ एक शब्द वापरतात -पालिमसेस्ट- म्हणजे काय? तर भूर्जपत्र. कसं भूर्जपत्रं? तर ज्या भूर्जपत्रावर एक निरोप लिहून झाला, की त्याला पांढरा रंग देऊन त्यावर दुसरा निरोप लिहिता येतो असं- इतिहासाच्या खुणा जपणारं भूर्जपत्र. आणि जर जाणकार हातांनी हा पालिमसेस्ट सोलला तर त्या खाली दडलेले अनेक निरोप वाचता येतात... निदान निरोपांचे अनेक थर इथं अस्तित्वात आहेत याचं भान येतं. अँथ्रॉपोलॉजित संस्कृतीचं स्वरूप या पालिमसेस्टसारखं बहुपदरी मानलंय.
मराठी असण्याबद्दल माझ्या असलेल्या प्रेमाचा परिपाक म्हणून असेल मला सेना-मनसे जेव्हा मराठी असण्याबद्दल बोलतात तेव्हा अंगावर काटा येतो. (अर्थात असाच काटा राष्ट्रवादीच्या पोस्टरवर 'भाषा हे साधन संपर्काचे नाही-संघर्षाचे' हे वाक्य बघितल्यावरही येतो.) कारण या राजकीय पक्षांना भाषेला राबवायचं आहे, वाढवायचं नाही.
बहुकेंद्री असणं हा भाषिक संस्कृतीचा मूळ धर्म आहे. तो भयापोटी नाकारून चालणारं संकुचित राजकारण चुकीचं वाटतं. या राजकीय पक्षांना मुंबईतलं मराठी मायनॉरिटीचं राजकारण कळतं, त्याचबरोबर जागतिकीकरणात डावलल्या गेलेल्या त्रस्त मराठी तरूण मुलांचं भयग्रस्त मन समजतं. मात्र त्यांना ज्ञानोबांनी सांगितलेला 'मराठी' असण्याचा पसायदान अर्थ लागण्याची सुतराम शक्यता नाही. तो अर्थ फार पुढची गोष्ट झाली पण त्यांना मूलभूत मानवी हक्क जपत लोकशाहीवादी राजकारण कसा करायचं हे पण समजून घ्यायचं नाही.
ख-या अर्थानं मराठी असणं म्हणजे आपल्या भूमीत रुजायला पोषक अशी मूलद्रव्यं सर्व संस्कृतींतून घेणं, त्यासाठी खुली धारणा बाळगणं आणि त्या खुलेपणामध्ये अनेकांना सामावून घेणं-- अशा रोबस्ट मराठीपणाच्या राजकारणाची मी वाट पाहतेय. कोंज्या अस्मितेच्या राजकारणाची नाही!
Friday, June 18, 2010
मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव
मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय किंवा 'तुम्ही सारे कट करून मला गंडवताय' असं वाटून ठसठसतं दुखरं बनलंय. या सा-यासकट, मला मराठी मन नेहमी न्यूनगंडानं ग्रासलेलं दिसतं. 'जगात जे काही 'बेश्टं' आहे त्यापेक्षा मी पावछटाक कमी आहे' असा भाव मराठी माणसाच्या चेहे-यावर कायम दिसतो. जणू तो न्यूनगंड झाकून टाकायला मराठी माणूस आक्रमक आणि चिडका बिब्बा असल्यासारखा वसवसत असतो.
उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.
मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.
मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.
पेशवाईची सत्ता 1818 ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं
आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.
डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.
स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.
नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.
अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.
मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.
वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.
'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'
आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.
उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.
मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.
मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.
पेशवाईची सत्ता 1818 ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं
आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.
डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.
स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.
नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.
अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.
मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.
वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.
'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'
आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.
Friday, June 4, 2010
खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा
मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी भाषिक समुहात अजूनतरी प्रिमियम नाही.
मराठी माणूस हुशार समजतो तरी कोणाला? आणि या हुशार समजण्याची परंपरा तपासली तर काय लक्षात येते? आपली हुशारपणाची व्याख्या बदलत चाललीय का?
स्वत:ला हुशार समजणा-या; शिवाय, ज्यांच्याकडे यशस्वीतेचे ठोस ब्रॅंडिंग आहे अशा माणसांना जर मराठी इतिहासातली ‘हुशार’ नावे विचारली तर त्यात शिवाजी महाराज, पहिला बाजीराव- द ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट आणि नाना फडणवीस या कॉमन थीम्स दिसतात. पोस्ट-पेशवाई हुशारीत राजवाडे-केतकर-टिळक आणि स्वातंत्र्यकालीन हुशारीत एकीकडे तर्कतीर्थ टाईप मंडळी तर दुसरीकडे सीडी देशमुख या उच्चवर्णीय नावांचे उल्लेख दिसतात.
डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांना त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल नावाजण्याची चाल उच्चवर्णियांमध्ये नाही हेही खेदाने जाणवते. इतकेच काय सावरकरांच्या हुशारीचे कौतुक करताना राजारामशास्त्री भागवत किंवा कर्मवीरांसारखा व्हिजनरी पुण्यामुंबईकडे पूर्णत: नजरेआड होतो.
हुशार समजण्याच्या प्रक्रियेत ‘जेंडर’ ही पण दुफळी दिसते. पंडिता रमाबाई, इरावती कर्वे आणि दुर्गाबाई यांच्याखेरीज हुशार बायकांच्या नामावळीत नावे सापडत नाहीत. ताराबाई शिंद्यांच्या थेट जिनिअसचा उदोउदो ऐंशीच्या दशकात, स्त्रीमुक्तीचे वारे वाहता असताना दिसतो.
एकीकडून ‘हुशार’ कोणाला म्हणायचे? हे जातिनिहाय ठरत जाताना – स्वातंत्र्योत्तर काळात ते विचारप्रणालीनिहाय ठरलेले दिसते. एकीकडे डांगे, कर्णिक, तळवलकर परंपरा, दुसरीकडे व्हाया तर्कतीर्थ, मे.पुं.रेगे वाई परंपरा, तिसरी प्रोफेशनल लोकांना बुद्धिमान मानण्याची परंपरा म्हणजे डॉ. शिरोडकर किंवा आयएएस अधिकारी किंवा लेखक यांच्यांतली हुशारी मराठी भाषिक समुहाने नावाजलेली दिसते. हुशार असण्याच्या व्याख्येत – विविध विषयांमधली व्युत्पन्नता, सोबत मराठी भाषिक समुहाशी जोडून घेण्याची क्षमता आणि काही प्रमाणात लेखन व वक्तृत्व गुण हे जणू काही आवश्यक घटक होते. समाजवाद्यांच्या गटात त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, नाथ पै ते मधू लिमये ही नावे, तुम्ही समाजवाद्यांपैकी कोणते समाजवादी आहात यावर अवलंबून घेतली जातात.
काही वेळा मराठवाड्यात कुरुंदकर, विदर्भात जिचकार किंवा सध्याच्या महाराष्ट्रात मुंबई- पुण्यात टिकेकर अशी विभागवार हुशारांची नामावळी देखील दिसते. याशिवाय विज्ञान विषयात नारळीकर किंवा संत साहित्यासाठी यू. म. पठाण , सदानंद मोरे अशी विभागणी दिसून येते
स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक समुहाने दोन परिमाणे शोधून काढली. दहावी परीक्षेत बोर्डात नंबर येणे – आणि त्या खालोखाल आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे. अमेरिकेचा व्हिसा प्रोफेशनल्ससाठी सत्तरच्या दशकात खुला झाल्यावर डॉक्टर होऊन अमेरिकेत जाणे हेदेखील ‘हुशार’ असण्याचे लक्षण बनून गेले. मेनस्ट्रीम मराठी समुहाला या तिन्ही गोष्टी अजून महत्त्वाच्या वाटतात.
शरद जोशी ते अविनाश धर्माधिकारींच्या पिढीपर्यंत आयएएस होण्यात / प्रशासकीय सेवेत निवड होण्यात ‘हुशार’ असण्याची ग्लोरी आहे असे मराठी समाजाला वाटत होते. मात्र आता, पोस्ट-भूषण गगराणी काळामध्ये (भूषण गगराणी आठवण्याचे कारण, त्यांनी मराठी वाड्मय हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला होता, त्याचा उल्लेख सतत होतो!) सरकारी बाबूंना हुशार समजायची चाल फारशी उरलेली नाही. कदाचित गगराणी हे त्या यादीतले अपवाद असतील.
मराठी भाषिक समुहात चिंतक, विद्वान, विचारवंत, लेखक यांची मांदियाळी निर्माण झाली – तशीच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही; परंतु हुशारपणाच्या पॅरामिटर्सवर अधिराज्य बहुतांश ‘ब्राह्मणी’ कल्पनांचे होते. ( जसे परवा मुकादमसर म्हणाले, की बाबा आढावांना कुठे आम्ही विचारवंत मानतो अजून?)
याला थोडासा छेद देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे तेंडुलकर आणि कुमार केतकर. ज्यांना पठडीपलीकडच्या डाव्या मतांचे कौतुक आहे अशाच लोकांना तेंडुलकर-केतकरांसारखे क्रिटिकल लेखक आवडतात आणि त्याच क्रिटिकल समुहात मेघा पाटकरांबद्दल आदर-पुष्पा भाव्यांच्या लेखनाचे कौतुकही वाटते. मात्र ‘प्रमाण’ मराठी भाषिक समुहाची ही चाल नाही.
नव्वदच्या दशकात, आयटी क्षेत्राने बाजी मारल्यावर, फक्त बुद्धिमता नाही तर त्याबरोबर ‘पैसा’ हे प्रामाण्यदेखील आवश्यक झाले. आता नारायणमूर्ती, नंदन नीलेकनी हे ‘हुशार’ असण्याचे आणि डॉ. अभय बंग किंवा डॉ. प्रकाश आमटे हे सामाजिक भान असण्याचे मानदंड झाले.
पुण्यात जन्माला आला असाल तर कपाळावर ज्ञान प्रबोधिनीचा ठप्पा हा अनेक काळ बुद्धिमान असण्याची पावती मानला जायचा. ज्ञानप्रबोधिनी, आयआयटी आणि अमेरिका या तीन गोष्टी म्हणजे पोस्ट-पेशवाई पुण्यात अजूनही हुशारीची चलनी नाणी आहेत. प्रबोधिनी नसली तर निदान पक्षी दहावी-बारावीची मेरिट लिस्ट हे नाणे तर कालपरवा, मेरिट लिस्ट खारीज होईपर्यंत चालायचे.
‘ज्ञानप्रबोधिनी’त प्रवेश परीक्षेत IQ टेस्ट घ्यायचे किंवा अजूनही घेतात. माझा मास्तर पॉल प्रायव्हेटिअर याचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ हे पुस्तक वाचत असताना मराठी ‘हुशारपणा’च्या व्याख्येचा हा इतिहास, त्यातले महत्त्वाचे नामोल्लेख मनात येत होते. पॉल प्रायव्हेटिअरने तर IQ या प्रकाराची सामाजिक मुळे शोधून काढून हा कोशंट ठरवणे हे सांस्कृतिक दृष्टया भेद करण्यासाठी निर्माण केलेले साधन कसे आहे याचा इतिहास लिहिलाय. ज्ञानप्रबोधिनी-ठप्पा, हुशारांचा IQ यांवरच पॉल प्रायव्हेटिअरचे पुस्तक प्रश्नचिन्ह निर्माण करते. पॉल सोबत शिकताना 'हुशारीकडे' एक स्वायत्त , निसर्गदत्त वस्तू म्हणून न बघता एक सामाजिक प्रोडक्ट म्हणून बघण्याची सवय लागली. मराठी हुशारीच्या perceptions म्हणून तपासणं महत्वाचं ठरत गेलं.
कोणता ही समाज ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे काय, हे कसे ठरवतो? मी एखाद्या आदिवासी पाड्यावर जन्माला आले असते तर माझे रान वाचायचे स्किल हे माझ्या हुशारीत गणले गेले असते का? की नाही?
मात्र सध्या ब्राह्मणी हुशारीचे-मानदंड कोसळतायत, अशा वेळी नवे मानदंड नसल्यामुळे, सर्वात सोपे – म्हणजे पैसा-प्रामाण्य हुशारीला सब्स्टिट्युट म्हणून वापरले जाते.
मात्र मी आता एका दुस-या डायनॅमिक्सकडे बघत आहे. मला वाटते, की जेव्हा रिसोर्सेस मर्यादित असतात तेव्हा त्या मर्यादित रिसोर्सेसवर कुणाचा हक्क आहे यातून सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना, बुद्धिमत्तेला उत्तेजन देते. सध्याच्या सगळ्या हुशार ‘डिजायनर्स’च्या पिढीकडे बघितल्यावर मला हे कुठेतरी जाणवते. NID किंवा IDC मध्ये प्रवेश मिळवणे दुरापास्त आणि म्हणून ही मायनॉरिटीतली ‘डिजायनर्स’ मंडळी दिवसेंदिवस ‘निश’ म्हणून बुद्धिमान गणली जातात. नव्या पोस्टमॉडर्न बाजारात अँडव्हर्टायजिंगला किंमत नाही. आता मानाचे स्थान आहे ते डिजायनर्सना.
मात्र मराठी भाषिक समुहात हे नवीन परिमाण अजून आलेले नाही. आम्हाला अजूनही टीव्हीवरची चमको मंडळीच ‘हुशार’ वाटतात! अजूनही आमचे लेखक त्यांच्या परदेशी डिग्र्या आणि मेरिट लिस्टमधल्या नंबरांवर खूष आहेत. आम्हाला ‘डिजायनर्स’मधली हुशारी समजेस्तोवर – डिजायनर्सच्या सात पिढ्या झालेल्या असतील. हे सगळे बघताना मन आतून खंतावते. पण मग ज्यांनी आपलं आयुष्यं डिजाईन केलं त्यांचं काय?
माणसाला माणूस म्हणून ओळखणा-या, अंतर्बाह्य integrity असणा-या, आपण जे कोणी आहोत त्या आपल्या स्पिरिटला पूर्ण उपलब्ध होणा-या ‘हुशार’ माणसांबद्दल सध्या तरी मराठी भाषिक समुहाला काही ठाऊक नाही.
आणि व्हिज्युअल भाषेत बोलणारे नवे हुशारप्राणी शब्दांतून दूर जायला लागल्यामुळे आता ‘माध्यम-चतुर’ आणि ‘व्हिज्युअल-तल्ल्ख’ अशा नव्या कॅटॅगरीज तयार होताना दिसतात.
पॉल प्रायव्हेटिअरचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ वाचून झाल्यावर जुन्या परिमाणांवरचा माझा क्रिटिकल रोष मलाच उमजून आला आणि त्याच प्रकाशात, ‘बुद्धी-बुद्धी’च्या मराठी खेळाची झालेली गोचीदेखील मला स्पष्ट दिसू लागली..
Thursday, May 27, 2010
कवितेचं नामशेष होत जाणं...
एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक तर संपलं. कशासाठी लक्षात राहतील ही दहा वर्षं? जगाच्या स्मृतित जसे 9/11, त्सुनामी, ओबामाची निवडणूक, डॉलीचा क्लोन राहिले - तशी कशासाठी लक्षात राहतील ही पहिली दहा वर्षं? म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी या दहा वर्षांत काय झालं? मराठी कवितेसाठी हे दशक कशासाठी लक्षात राहील? लाडक्या कवींच्या मृत्यूमुळे की मराठी कवितेच्याच नष्ट होण्याच्या प्रक्रियेमुळे?
अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, अरूण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मिळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं 'निर्वाणा अगोदरची पीडा' वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितेनी झोप उडवली, घसा कडू जहर केला, 'छबुकलं दारिद्रय' ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत - त्यांचं आजारपण, 'विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे'- अशी अर्पण पत्रिका, मल्लिका बरोबर लिहिलेल्या 'गोमू संगतीनं' दोन कविता - अनेक नामदेव ढसाळांनी ही 'निर्वाणा अगोदरची पीडा' प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ गेल्या दशकातल्या मृत कविंचे मृत्यू जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश काही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाचवेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कविता-सदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक - या दशकातला महत्त्वाच्या कविता त्या छापल्या जरी 2000 नंतर तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरूण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान 'सुमारांची सद्दी' या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदा सर्वदा सुमार कवी असतातच... पण सदा सर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
रॅण्डम मला असं वाटतं - की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मिळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथेसिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरूण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, टिङ्कटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता 'वामांगी' सारखी कविता शक्य तरी होईल का?
किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री - सुचिन्हा भागवत जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय, या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात 'मी नाय साला तुझी बायको होणार' ही एकमेव कविता या दशकातली आहे - पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत - तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय - पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं - अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथे त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुध्दाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.
सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस 'मी' नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच - त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात 'कविता' मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कविंच्या नसण्यानं - म्हणजे विंदा, चित्रे, कोलटकर, अरूण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय - या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीए का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय बहुधा.
'निर्वाणा अगोदरच्या पीडे'मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय - तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ''किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं'' - आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.
अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, अरूण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मिळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं 'निर्वाणा अगोदरची पीडा' वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितेनी झोप उडवली, घसा कडू जहर केला, 'छबुकलं दारिद्रय' ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत - त्यांचं आजारपण, 'विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे'- अशी अर्पण पत्रिका, मल्लिका बरोबर लिहिलेल्या 'गोमू संगतीनं' दोन कविता - अनेक नामदेव ढसाळांनी ही 'निर्वाणा अगोदरची पीडा' प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ गेल्या दशकातल्या मृत कविंचे मृत्यू जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश काही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाचवेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कविता-सदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक - या दशकातला महत्त्वाच्या कविता त्या छापल्या जरी 2000 नंतर तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरूण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान 'सुमारांची सद्दी' या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदा सर्वदा सुमार कवी असतातच... पण सदा सर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
रॅण्डम मला असं वाटतं - की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मिळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथेसिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरूण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, टिङ्कटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता 'वामांगी' सारखी कविता शक्य तरी होईल का?
किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री - सुचिन्हा भागवत जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय, या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात 'मी नाय साला तुझी बायको होणार' ही एकमेव कविता या दशकातली आहे - पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत - तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय - पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं - अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथे त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुध्दाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.
सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस 'मी' नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच - त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात 'कविता' मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कविंच्या नसण्यानं - म्हणजे विंदा, चित्रे, कोलटकर, अरूण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय - या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीए का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय बहुधा.
'निर्वाणा अगोदरच्या पीडे'मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय - तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ''किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं'' - आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.
Thursday, May 20, 2010
मायाजालात 'इंटरनेट हिंदू'
इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची संधी मिळाली. वाद सुरू झाला 'इंटरनेट हिंदू' या वाक्प्रयोगातून.
दिल्लीतील 'इंडिया इंटरनॅशनल'मधल्या कॅज्युअल चर्चाही बातम्या होतात. तसेच, इंटरनेटवरील काही वर्तुळांतले कॉईन शब्द तत्काळ प्रतिष्ठित कॉलम्समध्ये जातात!
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले. सागरिका यांनी टि्वटरवरच्या मतप्रदर्शनात 'इंटरनेट हिंदू' जमातीतल्या लोकांना शिव्या घातल्या, तेव्हा त्यांनी सारे 'इंटरनेट हिंदू' कसे तिय्यम दर्जाचे आहेत असे सांगत अजून पाच-पन्नास वेळा टि्वट केले. त्यांचे एक टि्वट माझ्या चांगल्या लक्षात राहिले. त्या लिहितात, ‘इंटरनेट हिंदू’ हे चवताळलेल्या माश्यांच्या झुंडींसारखे आहेत. मोदी, पाकिस्तान, मुस्लिम हे शब्द वाचले की या माश्यांची झुंड हल्ला करते.'' सागारिकला 'इंटरनेट हिंदूं'बाबत वाद-चर्चा करण्यापेक्षा त्यांना उचकावण्यात जास्त रस आहे असे माझे मत झाले आहे.
कांचन गुप्ता यांनी कॉइन झालेल्या या शब्दावर 'सण्डे पायोनियर'मध्ये लेख लिहिला. त्यांनी अमेरिकेत अथवा भारतात दिल्ली, चेन्नई अशा शहरांत स्थिर, झालेले उच्चशिक्षित उच्चभ्रू 'इंटरनेट हिंदू' हे स्युडो सेक्युलरिस्टांना कसे जागेवर ठेवतात याचे वर्णन आणि समर्थन केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे, विशेषतः सीएनएन-आयबीएन, एनडीटीव्ही ज्या पध्दतीने 'हिंदुत्वा’चे खंडन करतात ते 'इंटरनेट हिंदूं'ना आवडत नाही आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून टि्वट्स, ब्लॉग्ज, यांच्यावर आपापली मते मनसोक्त प्रकाशित करतात. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष यांच्या ब्लॉग्जवर 'इंटरनेट हिंदूं'च्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. माध्यमांची भूमिका एककल्ली आहे आणि पत्रकारांना जनतेला माहिती देण्यापेक्षा, त्यांना आपली मते लादण्यात जास्त रस आहे असे या 'इंटरनेट हिंदूं'चे मत असते. त्यामुळे सागरिका घोष यांना त्यांच्या 'डाव्या' मतांबद्दल शिव्या घालणे यात 'इंटरनेट हिंदूं'ना गैर वाटत नाही आणि 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखण्यात सागारिकला काही कमी वाटत नाही.
हिंदुत्ववाद ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जेव्हा वाढत होता तेव्हा डाव्यांना 'दंगलखोर शिवसैनिक' आणि 'अर्ध्या पँटीतले संघवाले' ही दोनच हिंदू रूपे ठाऊक होती. उलट, डाव्यांकडे इंटेलेक्चुअल्स, कामगार, कलाकार, सोविएत प्रणित फंडिंगवर जगणारे अनेक मान्यवर लेखक अशी जी विविधता होती, त्यापेक्षा कित्येकपट सरधोपट आणि अल्पसंख्य ओळख 'हिंदू' मते मांडणा-या समुहात होती. संजय पवार यांच्या 'कोण म्हणतं टक्का दिला?' नाटकामधला सोमनाथ मंदिराची पुनःपुन्हा आठवण काढणारा भाऊ हा या 'इंटरनेट हिंदूं'चा पूर्वसुरी मानता येईल!
मात्र हे गणित नव्वदच्या दशकानंतर बदलले. इंटरनेटचा वापर ऍकॅडमिक संस्थांमधून मोठया प्रमाणावर चालू झाला आणि समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संशोधन अशा ज्या क्षेत्रांत बहुतांश डाव्यांची मक्तेदारी होती त्या विषयांवर इतर विद्याशाखांतील माणसेही आपापली मते व्यक्त करू लागली. इंटरनेटमुळे प्रथमतः मानव्य शाखा आणि इंजिनीयरिंग, प्युअर सायन्स रिसर्च, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ या सा-यांना एकत्र व्यासपीठ निर्माण झाले. तोपर्यंत मानव्य शाखांत संशोधन करणा-या व्यक्तींना त्यांचा 'स्वायत्त' डावा कोष होता. आयआयटीत डावे-उजवे गट होते, परंतु ते हॉस्टेलमध्ये रात्र रात्र जागून केलेल्या भांडणांपुरते. y2k नंतरच्या काळात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, मानव्य शाखांचे शिक्षण नसलेले, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय, IT क्षेत्रांत घुसलेले घोडागिरी स्पेशालिस्ट (सॉरी, म्हणजे बॉडीशॉपिंगच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन फारसे महत्त्वाचे काम न करणारे असे लोक) यांची मोठी फळी इंटरनेटवर कार्यरत झाली. यांत काही अतिशय स्मार्ट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारेही होते.
या फळीला डाव्यांनी वर्षानुवर्षे उराशी कवटाळलेली समाजवादसुलभ मते पटायची नाहीत आणि तिथूनच 'स्युडो सेक्युलारिस्ट' या विशेषणाचा इंटरनेट वापर वाढलेला दिसून येईल.
पूर्वी 'याहू ग्रूप्स'वर वाद चालायचे. हे 'याहू ग्रूप्स' भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत इत्यादी गोष्टींवर चर्चा करायचे. एखाद्या 'याहू ग्रूप'वर हजारो माणसे जरी मेंबर असतील तरी त्यांतले व्यक्त होणारे दहा-पंधरा जणच असायचे. बाकीचे वाचक असायचे. 'इंटरनेट हिंदूं'चा पहिला जन्म झाला तो या 'याहू ग्रूप्स'वर. इथे प्रथम मी मुंबईतल्या ९२सालच्या अयोध्येनंतरच्या दंगलीबद्दलची चर्चा ८४च्या शीख दिल्लीतील दंगलींपर्यंत गेलेली वाचली किंवा रोमिला थापर यांना मनसोक्त शिव्या घालणा-या लेखकांचे ताशेरेही वाचले.
अनेकांनी 'याहू ग्रूप्स'मधून फुटून आपापले गट तयार केले. यात 'सॉनेट'चा (म्हणजे साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क) उल्लेख करते. 'याहू ग्रूप्स'ना कंटाळून लिबरल डाव्यांनी आपली वेगळी चूल मांडणे सुरू केले. 'सॉनेट'वर तर फक्त स्त्रिया पोस्ट करू शकायच्या. या सा-या ग्रूप्समध्ये इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या दोन-चार 'इंटरनेट हिंदूं'ची आणि लिबरल डाव्यांची सतत जुंपायची. दरम्यान, 'सुलेखा' या पोर्टलचा जन्म झाला. अनेक अनिवासी भारतीयांना 'सुलेखा'मुळे आधार मिळाला. त्यावर क्लासिफाईड्स होत्या, लग्ने जमवण्याची सोय होती; शिवाय ब्लॉग आणि चर्चा करण्यासाठीही जागा होती!
भारतातल्या भाजप सरकारच्या काळात, जेव्हा 'इंडिया शायनिंग' होता तेव्हा 'इंटरनेट हिंदूं'नी आघाडी घेतली. सुलेखावर त्या काळात झालेले 'आर्यांचे आक्रमण खरे की खोटे?', 'सिंधु संस्कृतीचा प्रश्न', 'प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये' या विषयांवरचे वाद मला आठवतात.
इन्फिनिटी फाऊंडेशनचे राजीव मल्होत्रा, बापा राव, संक्रांत सानू ही मंडळी तत्कालीन समाजात 'इंटरनेट हिंदूं'चे काम करत. डाव्यांच्या सेक्युलर तुच्छतावादाला इंटरनेटवरून दिलेले हे जहाल 'हिंदू' प्रत्युत्तर होते. त्या सुमारास झालेले दोन-तीन वाद महत्त्वाचे होते.
शिकागो विद्यापीठात वेंडी डोनिजर या प्राध्यापिका शिकवतात. अमेरिकन विद्यापीठात रिलिजन, रिलिजस स्टडीज या विषयांचा 'सेक्युलर' व ‘धार्मिक', दोन्ही अंगांनी अभ्यास होतो. यामध्ये अनेक वर्षे डोनिजरबाईंनी भारतीय हिंदू धर्माबद्दल लेखन, संशोधन केले आहे. मात्र पूर्वी, अशा त-हेचे लेखन केवळ विद्यापीठीय वाचनापुरते मर्यादित होते. Y2k नंतरच्या जगात उच्चविद्याविभुषित, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांनी डोनिजरबाईंची पुस्तके वाचली. त्यांना त्यातले भारतीय देवी-देवतांबद्दलचे उल्लेख असह्य झाले. वेंडी डोनिजर, पॉल कार्टेराईट, जेम्स लेन या तीन, 'रिलिजन' या विद्याशाखेत संशोधन करणा-या लेखकांवर ‘सुलेखा’वरून सडकून टीका करण्यात आली. नंतर त्याचेच पर्यवसान वेंडी डोनिजरवर अंडी फेकण्यात किंवा भारतात जेम्स लेनच्या पुस्तकावरून वादळ उठवण्यात झाले. 'इंटरनेट हिंदूं'चे हे शक्तिप्रदर्शन होते.
गेल्या आठवड्यात अशोक मलिक यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये 'व्हेन द फ्रिंज बेनिफिट्स' म्हणजे जेव्हा अल्पसंख्यांचा फायदा होतो असा कॉलम लिहिला, तेव्हा त्या कॉलममधून त्यांनी 'इंटरनेट हिंदू'चा पुन्हा उल्लेख केला.
अशोक मलिक यांच्या मते, भाजपप्रणित हिंदू फळीला वाव राहिलेला नसल्यामुळे ते आता 'इंटरनेट अँक्टिव्हिजम' करत आहेत.
कांचन गुप्ता यांचे मत वेगळे आहे. त्यांना या 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखायचे नाही. माध्यम आणि शिक्षणव्यवस्थेतली डाव्यांची दादागिरी हे 'इंटरनेट हिंदू' मोडीत काढतात असे त्यांना वाटते.
'याहू इंडिया'वरचा अमित वर्मांचा कॉलम आणि मला आवडणा-या 'सेपिया म्युटिनी' या ब्लॉगवरची मते मात्र मला या संदर्भात फार आवडली. अमित वर्माने सागरिका यांच्या दुख-या भागावर बोट ठेवले. इंटरनेटवर 'ट्रॉल' नावाची एक जमात असते. तुमच्या मतांना विरोध करून, अत्यंत ग्राम्य भाषेत तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला भडकावणे एवढेच 'ट्रॉल'चे काम असते. इंटरनेटवर ज्यांनी अनेक वर्षे काढली. त्यांनी या 'ट्रॉल'बरोबर वाद न घालता त्यांना दुर्लक्षून मारून टाकावे असे बेसिक ट्रेनिंग आवश्यक असते. हे ट्रेनिंग इंटरनेटवर मते व्यक्त करणा-या प्रत्येकाला हवे असे अमित वर्मांचे मत आहे. अमित वर्मा 'डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये. तुम्हाला चिखल लागतो आणि डुकरांना मज्जा येते!' असे मूळ तत्त्व सांगतात.
पण त्याही पलीकडचे सुंदर निरीक्षण नोंदवले गेले आहे, 'सेपिया म्युटिनी'वर. इंटरनेटवर माणसे वास्तवात आहेत, त्यापेक्षा जास्त अतिरेकी वागतात. शिवाय, समविचारी ब्लॉगर किंवा प्रतिक्रिया लिहिणारे भेटले की त्यांची मते अहमहमिकेने अधिक जहाल बनत जातात. या जहालपणाची चढाओढ चिन्ह जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी होते. मात्र इंटरनेटवरचा अतिरेकीपणा ही केवळ 'इंटरनेट हिंदूं'ची मक्तेदारी नाही असे 'सेपिया म्युटिनी'वर म्हटले आहे. इंटरनेट मार्क्सिस्टस्, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मुस्लिम असे अनेक प्रकारचे ‘कडवे वाल’ इंटरनेटवर जन्माला आलेले आहेत. यांच्या जन्माचे कारण म्हणजे त्यांची 'अस्मिते'ची भूक आहे. या नव्या अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. बदनामीचे एक साधन म्हणून इंटरनेट वापरता येऊ शकते, म्हणूनच केवळ 'इंटरनेट हिंदूं'ना खडयासारखे वेगळे काढता येणार नाही.
माध्यमांकडे, अँकॅडॅमिक्समध्ये पूर्वापार असणारी डाव्या विचारसरणीची वैचारिक दादागिरी नव्या पिढीला चालत नाही. मनसेच्या राड्यानंतर किंवा मिरजेच्या दंगलीनंतर तरुण मुले इंटरनेटवरून आपापली मते त्वेषाने मांडताना दिसतात. 'इंटरनेट हिंदूं'ची ही जनरेशन नेक्स्ट आहे. मनसेचे इंटरनेट मनसैनिक 'राजसाहेबांना' ज्या प्रकारे मानतात ते बघितल्यावर येणा-या काळाची चुणूक दिसते.
मात्र या माध्यमात अशा त-हेच्या नव्या अस्मिता जन्माला येताना बरेच काही शिकण्याजोगे आहे. 'महाराष्ट्र माझा' या शिरीष पारकरांच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचा उल्लेख 'व्हीटी' असा केला. ही बातमी टि्वटरवरून पसरताच इंटरनेट मनसैनिक सरसावले. ही तरुण पिढी किती वेगळी आहे बघा! त्यांतले अनेक जण म्हणाले, की 'राजसाहेबांनी व्हीटी म्हटले असेल तर ते चूक आहे. त्यांनी 'सॉरी' म्हणावे म्हणजे प्रश्न मिटला.' नेत्यांकडे, त्यांच्या राजकारणाकडे खुलेपणाने बघणारी ही तरुण पिढी इंटरनेटवर व्यक्त होत आहे.
अशा तरुण पिढीला अतिरेकी डावी मते मांडून स्वतःला स्नॉब समजणा-या सागरिका आवडणार नाहीत. तसेच, दुसरीकडे त्यांना श्रीराम सेनेचा मूर्खपणा किंवा संघिष्ट -हेटॉरिकल प्रतिवादही आवडणार नाही. 'इंटरनेट हिंदू', इंटरनेट ज्यू, इंटरनेट मराठी हे इंटरनेटवरी कडवे अस्मितावादी; परंतु ते त्यांच्या व्यवहारात अतिशय सेक्युलर असू शकतात, किंबहुना असतातच. इंटरनेटवर त्यांनी आपल्या कडवेपणाने लिबरल कडवेपणाला शह दिलेला असतो. इंटरनेट नावाच्या मायाजालातल्या या नव्या शक्यता आहेत. नेटवरच्या नव्या समीकरणांत पन्नाशीकडे झुकलेले जुने डावे, जुने समाजवादी, जुने हिंदू, जुने जहाल, कोणीही टिकणार नाहीत. आता नवे प्रॅग्मॅटिक जहाल इथे निर्माण होतील आणि स्वतःला शहाण्या समजणा-या प्रत्येक व्यक्तीचे राजकारण तपासून बघतील. त्यांचे विचार इंटरनेट माध्यमातून समाजमनात झिरपत जातील.
खरी ओळख लपवणे इंटरनेटमुळे शक्य होते. त्यामुळे इंटरनेटचे जग हे प्रत्येक सामाजिक व्यक्तीचे वाभाडे काढू शकेल. शेवटी, आपल्याला कोणत्या डुकरांशी कुस्ती खेळायची आहे की त्यांना सॉक्रेटिक शहाणपणापर्यन्त न्यायचे आहे हा असेल ज्याचा त्याचा प्रश्न!
दिल्लीतील 'इंडिया इंटरनॅशनल'मधल्या कॅज्युअल चर्चाही बातम्या होतात. तसेच, इंटरनेटवरील काही वर्तुळांतले कॉईन शब्द तत्काळ प्रतिष्ठित कॉलम्समध्ये जातात!
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले. सागरिका यांनी टि्वटरवरच्या मतप्रदर्शनात 'इंटरनेट हिंदू' जमातीतल्या लोकांना शिव्या घातल्या, तेव्हा त्यांनी सारे 'इंटरनेट हिंदू' कसे तिय्यम दर्जाचे आहेत असे सांगत अजून पाच-पन्नास वेळा टि्वट केले. त्यांचे एक टि्वट माझ्या चांगल्या लक्षात राहिले. त्या लिहितात, ‘इंटरनेट हिंदू’ हे चवताळलेल्या माश्यांच्या झुंडींसारखे आहेत. मोदी, पाकिस्तान, मुस्लिम हे शब्द वाचले की या माश्यांची झुंड हल्ला करते.'' सागारिकला 'इंटरनेट हिंदूं'बाबत वाद-चर्चा करण्यापेक्षा त्यांना उचकावण्यात जास्त रस आहे असे माझे मत झाले आहे.
कांचन गुप्ता यांनी कॉइन झालेल्या या शब्दावर 'सण्डे पायोनियर'मध्ये लेख लिहिला. त्यांनी अमेरिकेत अथवा भारतात दिल्ली, चेन्नई अशा शहरांत स्थिर, झालेले उच्चशिक्षित उच्चभ्रू 'इंटरनेट हिंदू' हे स्युडो सेक्युलरिस्टांना कसे जागेवर ठेवतात याचे वर्णन आणि समर्थन केले आहे. भारतीय प्रसारमाध्यमे, विशेषतः सीएनएन-आयबीएन, एनडीटीव्ही ज्या पध्दतीने 'हिंदुत्वा’चे खंडन करतात ते 'इंटरनेट हिंदूं'ना आवडत नाही आणि ते इंटरनेटच्या माध्यमातून टि्वट्स, ब्लॉग्ज, यांच्यावर आपापली मते मनसोक्त प्रकाशित करतात. राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोष यांच्या ब्लॉग्जवर 'इंटरनेट हिंदूं'च्या तिखट प्रतिक्रिया वाचायला मिळतात. माध्यमांची भूमिका एककल्ली आहे आणि पत्रकारांना जनतेला माहिती देण्यापेक्षा, त्यांना आपली मते लादण्यात जास्त रस आहे असे या 'इंटरनेट हिंदूं'चे मत असते. त्यामुळे सागरिका घोष यांना त्यांच्या 'डाव्या' मतांबद्दल शिव्या घालणे यात 'इंटरनेट हिंदूं'ना गैर वाटत नाही आणि 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखण्यात सागारिकला काही कमी वाटत नाही.
हिंदुत्ववाद ऐंशी आणि नव्वदच्या दशकांत जेव्हा वाढत होता तेव्हा डाव्यांना 'दंगलखोर शिवसैनिक' आणि 'अर्ध्या पँटीतले संघवाले' ही दोनच हिंदू रूपे ठाऊक होती. उलट, डाव्यांकडे इंटेलेक्चुअल्स, कामगार, कलाकार, सोविएत प्रणित फंडिंगवर जगणारे अनेक मान्यवर लेखक अशी जी विविधता होती, त्यापेक्षा कित्येकपट सरधोपट आणि अल्पसंख्य ओळख 'हिंदू' मते मांडणा-या समुहात होती. संजय पवार यांच्या 'कोण म्हणतं टक्का दिला?' नाटकामधला सोमनाथ मंदिराची पुनःपुन्हा आठवण काढणारा भाऊ हा या 'इंटरनेट हिंदूं'चा पूर्वसुरी मानता येईल!
मात्र हे गणित नव्वदच्या दशकानंतर बदलले. इंटरनेटचा वापर ऍकॅडमिक संस्थांमधून मोठया प्रमाणावर चालू झाला आणि समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय संशोधन अशा ज्या क्षेत्रांत बहुतांश डाव्यांची मक्तेदारी होती त्या विषयांवर इतर विद्याशाखांतील माणसेही आपापली मते व्यक्त करू लागली. इंटरनेटमुळे प्रथमतः मानव्य शाखा आणि इंजिनीयरिंग, प्युअर सायन्स रिसर्च, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील उच्चपदस्थ या सा-यांना एकत्र व्यासपीठ निर्माण झाले. तोपर्यंत मानव्य शाखांत संशोधन करणा-या व्यक्तींना त्यांचा 'स्वायत्त' डावा कोष होता. आयआयटीत डावे-उजवे गट होते, परंतु ते हॉस्टेलमध्ये रात्र रात्र जागून केलेल्या भांडणांपुरते. y2k नंतरच्या काळात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, मानव्य शाखांचे शिक्षण नसलेले, मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीय, IT क्षेत्रांत घुसलेले घोडागिरी स्पेशालिस्ट (सॉरी, म्हणजे बॉडीशॉपिंगच्या माध्यमातून अमेरिकेत जाऊन फारसे महत्त्वाचे काम न करणारे असे लोक) यांची मोठी फळी इंटरनेटवर कार्यरत झाली. यांत काही अतिशय स्मार्ट आणि इंग्रजीवर प्रभुत्व असणारेही होते.
या फळीला डाव्यांनी वर्षानुवर्षे उराशी कवटाळलेली समाजवादसुलभ मते पटायची नाहीत आणि तिथूनच 'स्युडो सेक्युलारिस्ट' या विशेषणाचा इंटरनेट वापर वाढलेला दिसून येईल.
पूर्वी 'याहू ग्रूप्स'वर वाद चालायचे. हे 'याहू ग्रूप्स' भारतीय संस्कृती, इतिहास, संगीत इत्यादी गोष्टींवर चर्चा करायचे. एखाद्या 'याहू ग्रूप'वर हजारो माणसे जरी मेंबर असतील तरी त्यांतले व्यक्त होणारे दहा-पंधरा जणच असायचे. बाकीचे वाचक असायचे. 'इंटरनेट हिंदूं'चा पहिला जन्म झाला तो या 'याहू ग्रूप्स'वर. इथे प्रथम मी मुंबईतल्या ९२सालच्या अयोध्येनंतरच्या दंगलीबद्दलची चर्चा ८४च्या शीख दिल्लीतील दंगलींपर्यंत गेलेली वाचली किंवा रोमिला थापर यांना मनसोक्त शिव्या घालणा-या लेखकांचे ताशेरेही वाचले.
अनेकांनी 'याहू ग्रूप्स'मधून फुटून आपापले गट तयार केले. यात 'सॉनेट'चा (म्हणजे साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क) उल्लेख करते. 'याहू ग्रूप्स'ना कंटाळून लिबरल डाव्यांनी आपली वेगळी चूल मांडणे सुरू केले. 'सॉनेट'वर तर फक्त स्त्रिया पोस्ट करू शकायच्या. या सा-या ग्रूप्समध्ये इंग्रजीवर प्रभुत्व असणा-या दोन-चार 'इंटरनेट हिंदूं'ची आणि लिबरल डाव्यांची सतत जुंपायची. दरम्यान, 'सुलेखा' या पोर्टलचा जन्म झाला. अनेक अनिवासी भारतीयांना 'सुलेखा'मुळे आधार मिळाला. त्यावर क्लासिफाईड्स होत्या, लग्ने जमवण्याची सोय होती; शिवाय ब्लॉग आणि चर्चा करण्यासाठीही जागा होती!
भारतातल्या भाजप सरकारच्या काळात, जेव्हा 'इंडिया शायनिंग' होता तेव्हा 'इंटरनेट हिंदूं'नी आघाडी घेतली. सुलेखावर त्या काळात झालेले 'आर्यांचे आक्रमण खरे की खोटे?', 'सिंधु संस्कृतीचा प्रश्न', 'प्राचीन भारतीय संस्कृतीची मूल्ये' या विषयांवरचे वाद मला आठवतात.
इन्फिनिटी फाऊंडेशनचे राजीव मल्होत्रा, बापा राव, संक्रांत सानू ही मंडळी तत्कालीन समाजात 'इंटरनेट हिंदूं'चे काम करत. डाव्यांच्या सेक्युलर तुच्छतावादाला इंटरनेटवरून दिलेले हे जहाल 'हिंदू' प्रत्युत्तर होते. त्या सुमारास झालेले दोन-तीन वाद महत्त्वाचे होते.
शिकागो विद्यापीठात वेंडी डोनिजर या प्राध्यापिका शिकवतात. अमेरिकन विद्यापीठात रिलिजन, रिलिजस स्टडीज या विषयांचा 'सेक्युलर' व ‘धार्मिक', दोन्ही अंगांनी अभ्यास होतो. यामध्ये अनेक वर्षे डोनिजरबाईंनी भारतीय हिंदू धर्माबद्दल लेखन, संशोधन केले आहे. मात्र पूर्वी, अशा त-हेचे लेखन केवळ विद्यापीठीय वाचनापुरते मर्यादित होते. Y2k नंतरच्या जगात उच्चविद्याविभुषित, भारतीय संस्कृतीवर प्रेम करणा-या लोकांनी डोनिजरबाईंची पुस्तके वाचली. त्यांना त्यातले भारतीय देवी-देवतांबद्दलचे उल्लेख असह्य झाले. वेंडी डोनिजर, पॉल कार्टेराईट, जेम्स लेन या तीन, 'रिलिजन' या विद्याशाखेत संशोधन करणा-या लेखकांवर ‘सुलेखा’वरून सडकून टीका करण्यात आली. नंतर त्याचेच पर्यवसान वेंडी डोनिजरवर अंडी फेकण्यात किंवा भारतात जेम्स लेनच्या पुस्तकावरून वादळ उठवण्यात झाले. 'इंटरनेट हिंदूं'चे हे शक्तिप्रदर्शन होते.
गेल्या आठवड्यात अशोक मलिक यांनी 'हिंदुस्थान टाइम्स'मध्ये 'व्हेन द फ्रिंज बेनिफिट्स' म्हणजे जेव्हा अल्पसंख्यांचा फायदा होतो असा कॉलम लिहिला, तेव्हा त्या कॉलममधून त्यांनी 'इंटरनेट हिंदू'चा पुन्हा उल्लेख केला.
अशोक मलिक यांच्या मते, भाजपप्रणित हिंदू फळीला वाव राहिलेला नसल्यामुळे ते आता 'इंटरनेट अँक्टिव्हिजम' करत आहेत.
कांचन गुप्ता यांचे मत वेगळे आहे. त्यांना या 'इंटरनेट हिंदूं'ना कमी लेखायचे नाही. माध्यम आणि शिक्षणव्यवस्थेतली डाव्यांची दादागिरी हे 'इंटरनेट हिंदू' मोडीत काढतात असे त्यांना वाटते.
'याहू इंडिया'वरचा अमित वर्मांचा कॉलम आणि मला आवडणा-या 'सेपिया म्युटिनी' या ब्लॉगवरची मते मात्र मला या संदर्भात फार आवडली. अमित वर्माने सागरिका यांच्या दुख-या भागावर बोट ठेवले. इंटरनेटवर 'ट्रॉल' नावाची एक जमात असते. तुमच्या मतांना विरोध करून, अत्यंत ग्राम्य भाषेत तुमच्याबद्दल लिहून तुम्हाला भडकावणे एवढेच 'ट्रॉल'चे काम असते. इंटरनेटवर ज्यांनी अनेक वर्षे काढली. त्यांनी या 'ट्रॉल'बरोबर वाद न घालता त्यांना दुर्लक्षून मारून टाकावे असे बेसिक ट्रेनिंग आवश्यक असते. हे ट्रेनिंग इंटरनेटवर मते व्यक्त करणा-या प्रत्येकाला हवे असे अमित वर्मांचे मत आहे. अमित वर्मा 'डुकरांबरोबर कुस्ती खेळू नये. तुम्हाला चिखल लागतो आणि डुकरांना मज्जा येते!' असे मूळ तत्त्व सांगतात.
पण त्याही पलीकडचे सुंदर निरीक्षण नोंदवले गेले आहे, 'सेपिया म्युटिनी'वर. इंटरनेटवर माणसे वास्तवात आहेत, त्यापेक्षा जास्त अतिरेकी वागतात. शिवाय, समविचारी ब्लॉगर किंवा प्रतिक्रिया लिहिणारे भेटले की त्यांची मते अहमहमिकेने अधिक जहाल बनत जातात. या जहालपणाची चढाओढ चिन्ह जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी होते. मात्र इंटरनेटवरचा अतिरेकीपणा ही केवळ 'इंटरनेट हिंदूं'ची मक्तेदारी नाही असे 'सेपिया म्युटिनी'वर म्हटले आहे. इंटरनेट मार्क्सिस्टस्, इंटरनेट ज्यू, इंटरनेट मुस्लिम असे अनेक प्रकारचे ‘कडवे वाल’ इंटरनेटवर जन्माला आलेले आहेत. यांच्या जन्माचे कारण म्हणजे त्यांची 'अस्मिते'ची भूक आहे. या नव्या अस्मिता समजून घेणे आवश्यक आहे. बदनामीचे एक साधन म्हणून इंटरनेट वापरता येऊ शकते, म्हणूनच केवळ 'इंटरनेट हिंदूं'ना खडयासारखे वेगळे काढता येणार नाही.
माध्यमांकडे, अँकॅडॅमिक्समध्ये पूर्वापार असणारी डाव्या विचारसरणीची वैचारिक दादागिरी नव्या पिढीला चालत नाही. मनसेच्या राड्यानंतर किंवा मिरजेच्या दंगलीनंतर तरुण मुले इंटरनेटवरून आपापली मते त्वेषाने मांडताना दिसतात. 'इंटरनेट हिंदूं'ची ही जनरेशन नेक्स्ट आहे. मनसेचे इंटरनेट मनसैनिक 'राजसाहेबांना' ज्या प्रकारे मानतात ते बघितल्यावर येणा-या काळाची चुणूक दिसते.
मात्र या माध्यमात अशा त-हेच्या नव्या अस्मिता जन्माला येताना बरेच काही शिकण्याजोगे आहे. 'महाराष्ट्र माझा' या शिरीष पारकरांच्या साप्ताहिकाच्या प्रकाशनाच्या वेळी राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसचा उल्लेख 'व्हीटी' असा केला. ही बातमी टि्वटरवरून पसरताच इंटरनेट मनसैनिक सरसावले. ही तरुण पिढी किती वेगळी आहे बघा! त्यांतले अनेक जण म्हणाले, की 'राजसाहेबांनी व्हीटी म्हटले असेल तर ते चूक आहे. त्यांनी 'सॉरी' म्हणावे म्हणजे प्रश्न मिटला.' नेत्यांकडे, त्यांच्या राजकारणाकडे खुलेपणाने बघणारी ही तरुण पिढी इंटरनेटवर व्यक्त होत आहे.
अशा तरुण पिढीला अतिरेकी डावी मते मांडून स्वतःला स्नॉब समजणा-या सागरिका आवडणार नाहीत. तसेच, दुसरीकडे त्यांना श्रीराम सेनेचा मूर्खपणा किंवा संघिष्ट -हेटॉरिकल प्रतिवादही आवडणार नाही. 'इंटरनेट हिंदू', इंटरनेट ज्यू, इंटरनेट मराठी हे इंटरनेटवरी कडवे अस्मितावादी; परंतु ते त्यांच्या व्यवहारात अतिशय सेक्युलर असू शकतात, किंबहुना असतातच. इंटरनेटवर त्यांनी आपल्या कडवेपणाने लिबरल कडवेपणाला शह दिलेला असतो. इंटरनेट नावाच्या मायाजालातल्या या नव्या शक्यता आहेत. नेटवरच्या नव्या समीकरणांत पन्नाशीकडे झुकलेले जुने डावे, जुने समाजवादी, जुने हिंदू, जुने जहाल, कोणीही टिकणार नाहीत. आता नवे प्रॅग्मॅटिक जहाल इथे निर्माण होतील आणि स्वतःला शहाण्या समजणा-या प्रत्येक व्यक्तीचे राजकारण तपासून बघतील. त्यांचे विचार इंटरनेट माध्यमातून समाजमनात झिरपत जातील.
खरी ओळख लपवणे इंटरनेटमुळे शक्य होते. त्यामुळे इंटरनेटचे जग हे प्रत्येक सामाजिक व्यक्तीचे वाभाडे काढू शकेल. शेवटी, आपल्याला कोणत्या डुकरांशी कुस्ती खेळायची आहे की त्यांना सॉक्रेटिक शहाणपणापर्यन्त न्यायचे आहे हा असेल ज्याचा त्याचा प्रश्न!
Subscribe to:
Comments (Atom)